HW News Marathi
महाराष्ट्र

नगरमध्ये संतप्त ग्रामस्थांचे रास्तारोको

अहमदनगर : शाळेची इमारत कोसळून सोमवारी सायंकाळी तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने संतप्त झालेल्या निंबोडीच्या गावक-यांनी मंगळवारी अहमदनगर – सोलापूर राज्यमार्गावर तब्बल दोन तास रास्तारोको केले. या वेळी आ. शिवाजी कर्डीले, आ. राहुल जगताप, शिवसेनेचे दक्षिण जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे, आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, गावातील शाळेला कुलूप ठोकण्यात आले असून शाळेसाठी नवीन इमारत उभी करेपर्यंत मुले शाळेत न पाठविण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.

अहमदनगर- निंबोडी राज्यमार्गावर सकाळी साडेनऊच्या सुमारास रास्तोरोकोला सुरुवात झाली. मागण्या मान्य होत नाहीत,तोवर माघार घेणार नसल्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली. गावात दुसरी शाळा उभारण्याची मागणीही करण्यात आली. तसेच मयतांच्या कुटुबियांना जास्तीत जास्त शासकीय मदत मिळावी. जखमींचा सर्व खर्च शासनाने करावा, यासह विविध मागण्या या वेळी ग्रामस्थांनी केल्या.

आ. शिवाजी कर्डीले यांनी ग्रामस्थांना रास्तारोको मागे घेण्याचे आवाहन करत दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. फोनवरून शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी संपर्क साधला. यावेळी तावडे यांनी गावक-यांच्या सर्व मागण्या मान्य करत असून येत्या आठ दिवसांत नवीन शाळेसाठी सर्व मदत करू, असे आश्वासन दिले. त्यानंतर साडेअकरा वाजण्याच्या सुमारास रास्ता रोको मागे घेण्यात आला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

5वी आणि 8वीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली नवी तारीख जाहीर…!

News Desk

शरद पवारांचा त्या पत्रावर खुलासा… ज्यांनी पत्राचा हवाला दिला आहे त्यांनी ते थोडं नीट वाचलं असतं तर…

News Desk

‘बँकेच्या ठेवीदारांना आर्थिक संरक्षण देण्यासाठी केंद्राचं पाऊल…’, केंद्रीय अर्थमंत्र्यांची महत्त्वाची माहिती!

News Desk