HW News Marathi
महाराष्ट्र

केंद्रीय पथकाने अतिवृष्टीची आत्ता पाहणी करणं म्हणजे पेशंट दगावल्यानंतर डॉक्टर येणं!

मुंबई | अतिवृष्टीनं नुकसान होऊन अनेक दिवस उलटले. मात्र तेव्हा केंद्र सरकारचं कोणतंही पथक पाहणीला आलं नाही. केंद्र सरकारला उशिरा शहाणपण आलं आणि मग आता राज्यात केंद्रीय पथकाकडून नुकसानीची पाहणी होत आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार रोहित पवार यांनी सडकून टीका केलीय. केंद्रीय पथकाने अतिवृष्टीची आत्ता पाहणी करणं म्हणजे पेशंट दगावल्यानंतर डॉक्टर येणं असला प्रकार आहे, असं मत रोहित पवार यांनी व्यक्त केलं. यावेळी त्यांनी केंद्र सरकारने अन्नदात्याची अशी चेष्टा करू नये, अशीही मागणी केली आहे.

रोहित पवार यांनी ट्विट करत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच आता पथक नको, थेट मदत पाठवा, अशी मागणी केली आहे. ते म्हणाले, “राज्यात अतिवृष्टीमुळं झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी 2 महिन्यांनी येत असलेलं केंद्राचं पथक म्हणजे पेशंट दगावल्यानंतर डॉक्टर येणं असला प्रकार आहे. केंद्र सरकारने अन्नदात्याची अशी चेष्टा करू नये. आता पथक नको मदत पाठवा.”

केंद्रीय पथकाच्या या पाहणीवर राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे म्हणाले, “शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. राज्य सरकारने केंद्राकडे वारंवार मदत करावी अशी मागणी केली होती. मात्र या मागणीकडे दुर्लक्ष केलं गेलं. आता शास्त्रीय पद्धतीने पाहणी करावी म्हणजे नुकसान दिसेल. मुख्यमंत्र्यांनी या अगोदरच या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत केली आहे.”

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाविकासआघाडी सरकारचा खासदार उदयनराजेंना धक्का

News Desk

बऱ्याच गोष्टी सिद्ध करण्यासाठी प्रमाणपत्राचीच गरज लागते, अमृता फडणवीसांचा हिंदुत्वाच्या मुद्यावरुन टोला

News Desk

‘म्याव म्याव’ करणारे लपून बसलेत, दीपक केसरकर यांचे नितेश राणेंवर टीकास्त्र

Aprna