HW News Marathi
देश / विदेश

“नितीश कुमार त्यांच्या सोबत झालेला घात पचवतील?” रोहित पवारांचा सवाल  

मुंबई | बिहार विधानसभा निवडणूकीत भाजपने आपला झेंडा फडकला आहे. मात्र, दुसरीकडे भाजप मित्रपक्षांना संपवत असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. याचे उत्तम उदाहरण बिहारमध्ये पाहायला मिळाले. संयुक्त जनता दलाचे नेते नितीश कुमार यांचा घात झाला, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच आमदार रोहित पवार यांनी केले आहे. बिहारच्या निवडणुकीत ‘एनडीए’ला १२५ जागांवर विजय मिळाला असला तरी यामध्ये ‘जदयू’च्या अवघ्या ४३ आमदारांचा समावेश आहे. जदयू पक्षाच्या स्थापनेपासूनची ही सर्वात खराब कामगिरी आहे.

भाजप ज्या पद्धतीने मित्रांनाच संपवत आहे याचं उत्तम उदाहरण यानिमित्ताने बिहारमध्ये पहायला मिळालं. यातून बोध घेऊन नितीश कुमार हे त्यांच्याशी झालेला घात पचवतात की काही वेगळा निर्णय घेतात, हे पहावं लागेल, असे रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. तर दुसरीकडे रोहित पवार यांनी राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांचीही प्रशंसा केली आहे. बिहारमध्ये काट्याची टक्कर सुरू असली तरी बलाढ्य शक्तीशी एकटे लढत असलेले तेजस्वी यादव हेच खरे हिरो आहेत. त्यांना बिहारी युवांनीही खंबीर साथ दिली, असे रोहित पवार यांनी सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रातल्या तीन महिलांना ‘नारी शक्ती पुरस्कार’; राष्ट्रपतींच्या हस्ते होणार ८ मार्च रोजी सन्मानित

Aprna

राहुल गांधींच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे लोकसभेत गदारोळ

News Desk

फेसबुक, इन्स्टाग्राम सेवा डाऊन, ट्विटरवर तक्रारी

News Desk