HW News Marathi
देश / विदेश

शेतकऱ्यांचा अंत न पाहता शेतकऱ्यांशी संवाद साधायला हवा-  रोहित पवार

नवी दिल्ली |केंद्र सरकारच्या शेतकरी कायद्याच्या विरोधात पंजाब आणि हरियाणा येथून मोठ्या संख्येने शेतकरी दिल्लीत येत आहेत. आंदोलक शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेश आणि पोलीस जमा झाले आहेत. यासाठी दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांसाठी रोखण्यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कामगार धोरणांच्या विरोधात आज कामगार संघटनांनी देशव्यापी संप पुकारला आहे.

कुरुक्षेत्रातील शेतकऱ्यांवर पोलिसांनी वॉटर कॅनॉन सुरू केला आहे. दरम्यान, पोलिसांनी दिल्लीकडे कूच करणार्‍या आंदोलक शेतकर्‍यांवर वॉटर कॅनॉनचा वापर केला आणि जमाव मोडून काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहीत पवार यांनी फेसबूक पोस्ट केली आहे. “शेतकरी हा देशाचा शत्रू नाही तर अन्नदाता आहे, हे केंद्र सरकारने समजून घेऊन त्यांच्याशी संवाद साधण्याची गरज आहे. दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्याही वाढतेय. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचा अंत न पाहता कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी त्वरित शेतकऱ्यांशी संवाद साधायला हवा”, असे रोहीत पवार यांनी म्हटले आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भारत-पाक सीमेवर २,०६१ पैकी केवळ ६६१ फेन्सिंग लाईट पोल्सच चालू

News Desk

परराष्ट्र मंत्रालयाकडून पाकिस्तानच्या उप उच्चायुक्तांना समन्स

News Desk

वागुरा नौगाम सेक्टरमध्ये ग्रेनेड हल्ला, सीआयएसएफचा अधिकारी शहीद

swarit