HW News Marathi
महाराष्ट्र

राजकीय हेतूसाठी महाराष्ट्रावर चिखलफेक केली तर…रोहित पवारांचे चिराग पासवान यांना पत्र 

मुंबई | अभिनेत्री कंगना राणावत प्रकरणावरुन बिहारमधील लोक जनशक्ती पार्टीचे नेते चिराग पासवान यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. कंगनाला राज्य सरकार निशाणा करत आहे. महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या होत आहे असेही त्यांनी म्हटले होते. त्यावरुन आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी चिराग पासवान यांना पत्र लिहिले आहे.

जेव्हा २०१८मध्ये मुजफ्फरपूर येथील निवारागृहात मुलींचे लैंगिक शोषण करण्यात आले होते. त्यावेळी तुम्हीच म्हणाला होतात की, अशा घटना इतर जिल्ह्यातही घडल्याचे समोर येत आहे. मग तेव्हा बिहारमध्येच राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी का केली नाही, असा सवाल रोहित पवारांनी खासदार चिराग पासवान यांना केला आहे.

चिरागजी, सुशांतच्या दुःखद मृत्यूचा वापर आपल्या राजकीय करिअरसाठी करणाऱ्या अभिनेत्रीच्या सूरात सूर मिसळून महाराष्ट्राविरोधात टीका करणं सोप्पं आहे. पण , बिहारमधील जर्जर झालेल्या प्रत्येक मूलभूत सुविधेची जबाबदारी घेऊन त्यात सुधारणा करणं अवघड आहे, असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.

तसेच सामान्य जनतेचे काय हाल असतील ते सगळ्या घटनांवरुन दिसून येते. गेल्या १५ वर्षात ६ पेक्षा जास्त अधिकाऱ्यांची गुन्हेगारांनी हत्या केली. आश्चर्य आहे की, तेव्हा तुमचा पक्ष सत्ताधारी पक्षासोबत आघाडीत होता. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचा वापर स्वत:च्या राजकीय लॉन्चिंगसाठी करत अभिनेत्रीच्या सुरात सूर मिसळून महाराष्ट्राच्या विरोधात वक्तव्य करणे सोपे आहे. पण बिहारच्या बिकट परिस्थितीशी जबाबदारी घेत त्यात सुधारण करणे कठीण आहे. तुम्ही राजकारणासाठी सोपा मार्ग निवडत आहात याचे दु:ख आहे. फक्त राजकीय हेतूसाठी महाराष्ट्रावर चिखलफेक केली तर राज्यातील जनता कधीच सहन करणार नाही असा इशारा आमदार रोहित पवारांनी चिराग पासवान यांना दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लॉकडाऊनमध्ये दररोज २० हजार क्विंटल शेतमालाची ऑनलाईन आणि थेट विक्री, कृषी विभागाची माहती

News Desk

मिलिंद देवरा यांनी मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला

News Desk

एसटी कर्मचाऱ्यांचा मंत्रालयावर मोर्चा, सदाभाऊ खोत घटनास्थळी, पोलिसांकडून अडवणूक

News Desk