HW News Marathi
महाराष्ट्र

इतर राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या नागरिकांना RT-PCR टेस्ट करणे बंधनकारक

मुंबई | राज्यात कोरोनाची दुसरी लाट येऊ नये म्हणून महाराष्ट्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातून इतर राज्यात गेलेल्या व्यक्तिला परत राज्यात परतायचे असेल तर त्यालाही कोविड टेस्ट करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. २५ नोव्हेंबरपासून हा नियम लागू होणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

विजय वडेट्टीवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. दिल्ली आणि गुजरातमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अहमदाबादला तर नाईट लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. अहमदाबाद आणि सुरत ही दोन्ही शहरं मुंबईजवळ असल्याने येथील नागरिक मुंबईत येऊ शकतात. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने राज्यात विमान, रेल्वे आणि रस्ते मार्गांनी येणाऱ्यांवर कठोर निर्बंध घालण्यात आले आहेत. इतर राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्यांना RT-PCR टेस्ट निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट दाखवावा लागणार आहे. त्यानंतर त्यांना राज्यात प्रवेश मिळेल. तसेच महाराष्ट्रातील लोक जर इतर राज्यात जात असतील तर येताना त्यांनाही कोविड निगेटिव्ह रिपोर्ट दाखवणं बंधनकारक राहणार आहे. त्यांच्याकडे कोविड निगेटिव्हचा रिपोर्ट नसेल त्याला टेस्ट करणं बंधनकारक राहणार असल्याचं वडेट्टीवार यांनी सांगितलं.

दरम्यान, दिवाळीनंतर दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि गोव्यात कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. महाराष्ट्रातही हा आकडा वाढत असल्याने त्यावर नियंत्रण आणण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मिशन बिगीन अगेन अंतर्गत गोवा, दिल्ली, गुजरात आणि राजस्थानमधून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांसाठी महाराष्ट्र सरकारने नवीन नियमावली लागू केली आहे. विमान, रस्ते मार्ग आणि रेल्वे मार्गाने महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. २५ नोव्हेंबरपासून हे निर्बंध लागू होणार असल्याचं नोटिफिकेशन्समध्ये नमूद करण्यात आलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वित्त राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडला महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी २०२१-२२ चा अहवाल

Aprna

दावोसमध्ये आत्तापर्यंत महाराष्ट्रातील गुंतवणुकीसाठी ८८ हजार ४२० कोटींचे करार

Aprna

समाजविघातक घटक सांगून परवानगी न घेता फोन टॅपिंग केल्याचा राऊतांचा आरोप

Aprna