HW News Marathi
महाराष्ट्र

कोरोनाबाबतीत दिलेल्या सल्ल्यामुळे संभाजी भिडे अडचणीत

पुणे | नेहमीच वादाच्या भोवऱ्यात असणारे शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची दिशाभूल आणि फसवणूक करण्याच्या आरोपाखाली संभाजी भिडेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी संभाजी ब्रिगेड या संघटनेने केली आहे. काही दिवसांपूर्वी संभाजी भिडे यांनी गाईच्या तुपाने भरलेले बोट नाकात फिरवले किंवा गोमूत्र प्यायल्याने कोरोनाग्रस्त रुग्ण बरे होतात, असा दावा केला होता. भिडेंच्या याच दाव्यावर ब्रिगेडने आक्षेप घेतला आहे. तसेच, संभाजी भिडेंच्या मेंदूला कोरोनाची लागम झाली आहे का याची तपासणी करा अशी टीकाही केली आहे.

दरम्यान, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष संतोष शिंदे यांनी सांगलीच्या पालकमंत्र्यांकडे भिडेंच्या मेंदूला कोरोनाची लागण झाली नाही आहे ना हे तपासून घेण्यास सांगितले आहे. कोरोना बरा होण्यासाठी गोमूत्र आणि तूप खावे असे सांगत लोकांची फसवणूक करत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

काय दिला होता संभाजी भिडे यांनी सल्ला?

गोमूत्र आणि गायीचे तूप हे जंतूनाशक आहेत. त्यामूळे देशातील सरकारने कोरोनाबाधित रुग्णांऱ गोमूत्र आणि गायीचे तूप याचा उपयोग करावा. तूपाने भरलेले बोट नाकात फिरवल्याने आणि खाण्यापिण्यातही तूपाचा उपयोग केल्यास बाधित रुग्ण बरे होतील, असा सल्ला संभाजी भिडे यांनी केंद्र आणि राज्य सरकारला दिला होता.

दरम्यान, महाराष्ट्र कोव्हीड-१९ उपाययोजना नियम २०२०’ मधील तरतुदीनुसार कोणत्याही व्यक्ती /संस्था / संघटनांना कोरोनाबाबत कोणत्याही प्रकारच्या अफवा, अनधिकृत माहिती पसरवण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. याबाबत संबंधित सरकारी अधिकारी आणि विभागांकडून अधिकृत माहितीचे प्रसारण करण्यात येईल, असेही यात नमूद केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

उदयनराजे म्हणाले, “काय बाई सांगू?”; शिवेंद्रराजेंनी विचारलं, “तुम्हाला लाज…”

News Desk

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला मेट्रो ४ मार्गाच्या कामांचा आढावा

Aprna

परमबीर सिंग यांची ठाकरे सरकारविरोधात पुन्हा उच्च न्यायालयात धाव

News Desk