HW News Marathi
महाराष्ट्र

जनसंघाचे २ खासदार असताना तुम्ही लालकृष्ण अडवाणी आणि वाजपेयींना महानच म्हणायचा ना? पडळकरांना खरातांचा प्रतिप्रश्न

मुंबई | भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांच्या संख्येचा दाखला देत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केल्यानंतर आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरु झाले आहे. या वादात आता आरपीआय खरात गटाचे नेते सचिन खरात यांनी उडी घेतली आहे. जनसंघाचे २ खासदार असताना तुम्ही लालकृष्ण अडवाणी आणि वाजपेयींना महानच म्हणायचा ना, असा प्रतिप्रश्न खरात यांनी गोपीचंद पडळकर यांना विचारला आहे.

सचिन खरात आज (२३ नोव्हेंबर) मुंबई प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. गोपीचंद पडळकर, तुमच्या पूर्वीच्या जनसंघाचे दोन खासदार होते तरीही तुम्ही माननीय लालकृष्ण अडवाणी यांना लोहपुरुष आणि माननीय अटलबिहारी वाजपेयी यांना महान नेता म्हणत होता. त्यामुळे खासदारांच्या संख्येवर कोणत्याही नेत्यांची उंची मोजता येत नाही. दुसऱ्याला बोट दाखविताना स्वतः कडे चार बोटं येतील ध्यानात ठेवा, असे खरात यांनी पडळकरांना सुनावले आहे.

काय म्हणाले होते गोपीचंद पडळकर?

ज्या पक्षाचे ४ खासदार निवडून येतात, त्यांना लोकनेता म्हणता, मग ३०३ खासदार निवडून देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना काय म्हणायचं, असा सवाल भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी विचारला होता. तुम्ही मोदींवर टीका करता, मग आम्ही तुमच्यावर टीका केली, तर इतका त्रागा का करता, असं म्हणत त्यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा आरक्षणासाठी सरकारच्या कानाखाली आवाज काढू, प्रसाद लाडांचा इशारा

News Desk

“आपण ज्या नर्सरीत शिकता, त्या संस्थेचे संस्थापक शरद पवार आहेत”, राष्ट्रवादीने सदाभाऊ खोत यांना सुनावले

News Desk

..तर ‘एटीएस’ने आता नाना पटोले यांचीही चौकशी करावी – सामना

News Desk