HW News Marathi
महाराष्ट्र

शरद पवारांनी जे पेरले तेच उगवले आहे !

मुंबई | “शरद पवारांनी अनेकांचे पक्ष फोडले आहेत. त्यामुळे आता त्यांना राष्ट्रवादी पक्ष त्यांच्याच डोळ्यादेखत फुटताना पाहावा लागत आहे. शरद पवार यांनी जे पेरले तेच उगवले आहे”, अशी बोचरी टीका कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केली आहे. विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने राष्ट्रवादीला मोठी गळती लागली आहे. याच पार्श्वभूमीवर सदाभाऊ खोत यांनी या संपूर्ण स्थितीचा दोष शरद पवार यांना दिला आहे.

“शरद पवार हे आता स्वतः केलेल्या कर्माचेच चित्र बघत आहेत. शरद पवार यांनी अनेकांचे पक्ष फोडले आहेत. आज त्यांना त्यांचा राष्ट्रवादी पक्ष त्यांच्याच डोळ्यांदेखत फुटताना पाहावा लागत आहे. आपल्याकडे एक म्हण प्रचलित आहे ‘करावे तसे भरावे’. पवार साहेबांनी पेरले तेच उगवत आहे”, अशी घणाघाती टीका सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर केली आहे. “पवारांनी वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसला असे बोलले जाते. त्यावेळी वसंतदादा यांना किती दुःख झाले असेल ?”, असा सवाल देखील यावेळी त्यांनी उपस्थित केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राम जन्मभूमीच्या संघर्षातील नेत्यांवरील ठपका पुसला गेला!

News Desk

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारातच समाजाला एकजूट ठेवून पुढे घेऊन जाण्याची ताकद  – अजित पवार

News Desk

जाणून घ्या १० वी-१२ वीचा निकाल कधी जाहीर होणार

News Desk