HW News Marathi
महाराष्ट्र

एवढा नामोहरम, जनतेपासून तुटलेला विरोधी पक्ष पाहिला नाही !

मुंबई | “मी एवढा नामोहरम आणि जनतेपासून तुटलेला विरोधी पक्ष कधीही पाहिला नाही”, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर घणाघाती टीका केली आहे. शुक्रवारी (२ ऑगस्ट) राज्यातील सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांनी ईव्हीएमविरोधात एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्याचप्रमाणे, सर्व विरोधी पक्षांकडून येत्या २१ ऑगस्टला ईव्हीएमविरोधात मोर्चा काढण्यात येणार असल्याचे देखील यावेळी स्पष्ट करण्यात आले. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर सडकून टीका केली आहे. १ ऑगस्टपासून मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेला सुरुवात झाली आहे. या महाजनादेश यात्रेचा आज (३ ऑगस्ट) तिसरा दिवस आहे. यावेळी भंडारा येथे बोलताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

“आता विरोधकांकडे निवडणुकीचे मुद्देच उरले नाहीत. म्हणून महाराष्ट्रात पहिल्यांदाच विरोधकांची एकजूट झाली. ही एकजूट शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नाही, दलित-शोषितांच्या प्रश्नावर नाही, गरिबांच्या प्रश्नवर नाही. तर विरोधकांची ही एकजूट झाली ईव्हीएमविरुद्ध. आता एक मुलगा परीक्षेला गेला आणि त्यांना पेपरमधले काहीच आले नाही तर त्यासाठी पेनला दोष देता येईल का ? “, असे उदाहरण देत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना टोला लगावला. त्याचप्रमाणे “मी एवढा नामोहरम आणि जनतेपासून तुटलेला विरोधी पक्ष कधीही पाहिला नाही”, अशी जोरदार टीका देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विधानसभा व लोकसभा पोटनिवडणुकीतील विजय हा काँग्रेसवरच्या विश्वासाचे प्रतिक!

News Desk

राज्य सरकारने बोकडाच्या कुर्बानीवर कोणतीही बंदी घातलेली नाही – नवाब मलिक

News Desk

बोगस मतदान रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी लिहिले निवडणूक आयोगाला पत्र

News Desk