HW News Marathi
Covid-19

अन्यथा परप्रांतीय मजुरांप्रमाणे राज्यातील मजूरांचा प्रश्न ही गंभीर बनेल

पुणे | कोरोनामूळए सगळ्यात जास्त हाल झाले आहेत ते मजूरांचे आणि श्रमिकांचे. मुंबई आणि पुण्यातील मजुरांसाठी रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी आक्रमक पावित्रा हाती घेतला आहे. या मजुरांना गावात प्रवेश देण्यास विरोध करणाऱ्या लोकप्रतिनिधींचाही त्यांनी समाचार घेतला आहे. मुंबई आणि पुण्यासारख्या महानगरातील मजुरांना गावी परतण्याची सोय सरकारनं त्वरित करावी, अशी सूचना सदाभाऊ खोत यांनी दिली आहे.

“या मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी सरकारने उपाययोजना करावी. अन्यथा परप्रांतीय मजुरांप्रमाणे राज्यातील मजूरांचा प्रश्न ही गंभीर बनेल,” अशी भीती खोत यांनी व्यक्त केली. मजूर गावात आल्यानंतर त्यांना जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये क्वारटांईन करुन ठेवा, अशी सूचना ही त्यांनी केली आहे. मजूरांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही असेही त्यांनी म्हटले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अमरावतीत आरोग्यमंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा भाजपने रोकला

News Desk

‘मनसे’च्या हर्षवर्धन जाधव यांचा राजकारणातून संन्यास, दिले ‘हे’ कारण

News Desk

सांगलीत आजपासून काय सुरु काय बंद? जाणून घ्या…

News Desk