HW News Marathi
Covid-19

…मग पंतप्रधानही अयोध्येचा कार्यक्रम दिल्लीतून प्रतिकात्मक का करत नाहीत ?

नवी दिल्ली | एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील हे सरकारच्या विरोधात चांगलेच आक्रमक झाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. बकरी ईदसाठी सरकारने केलेली नियमावली आपल्याला मान्य नसल्याचे इम्तियाज जलील यांनी स्पष्ट केले आहे. “आम्हाला प्रतिकात्मक बकरी ईद साजरी करण्याचा सल्ला दिला जात आहे. तर मग पंतप्रधान मोदी ५ ऑगस्टला ज्या कार्यक्रमासाठी अयोध्येला जाणार आहेत, तो कार्यक्रम दिल्लीत बसून प्रतिकात्मक का केला जात नाही ?”, असा सवाल देखील जलील यांनी उपस्थित केला आहे.

इम्तियाज जलील यांनी बकरी ईदसाठी मशिदी उघडण्याला तसेच प्राण्यांची कुर्बानी देण्याची परवानगी मागितली होती. मात्र, सरकारकडून प्रतिकात्मक बकरी ईद साजरी करण्याच्या सूचना मुस्लिम बांधवांना देण्यात आल्या आहेत. सरकारच्या या निर्णयाला इम्तियाज जलील यांनी जोरदार विरोध केला आहे. त्याचसोबत, जलील यांनी पंतप्रधानांच्या अयोध्या दौऱ्यावरही निशाणा साधल्याचे पाहायला मिळत आहे. “नक्की कोणते अधिकारी, काय विचार करून हे असे नियम बनवतात ?”, असा सवालही जलील यांनी उपस्थित केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदी सरकारनंच अदर पुनावालांना धमकी दिली, राष्ट्रवादीचा गंभीर आरोप

News Desk

भारतात आता रशियाच्या स्फुटनिक लसीच्या वापराला परवानगी! 

News Desk

कोरोना लसीकरणासाठी आता ‘कोविन’ ॲपची सक्ती रद्द!

News Desk