HW News Marathi
महाराष्ट्र

कृषी कायद्यावर विचार करा अथवा आक्रमक पवित्रा घेऊ, सदाभाऊ खोत यांचा इशारा

मुंबई | राज्यशासनाच्या पणन विभागाने कृषी कायद्याला स्थगिती दिली आहे. त्याचा फेरविचार करुन राज्य सरकारने ही स्थगिती उठवावी. अन्यथा आक्रमक पवित्रा घेऊ, असा इशारा रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली काल.(६ ऑक्टोबर) शेती आणि पणनसंबंधी केंद्र सरकारच्या कायद्यांवर विचारविनिमय करुन धोरण निश्चित करण्याबाबत विविध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींशी बैठक पार पडली.

केंद्र शासनाने ३ कृषी विधेयके लोकसभा, राज्यसभा मध्ये मंजूर करुन सदर विधेयक वरती देशाचे राष्ट्रपती यांचीही स्वाक्षरी झालेली आहे. तरीसुद्धा महाराष्ट्र शासनाच्या पणन विभागाने सदर केंद्र शासनाच्या आणि शेतकरी हिताच्या विधेयकाला स्थगिती देऊन कायद्याचे उल्लंघन करुन शेतकऱ्यांच्या वर अन्याय केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रभर रयत क्रांती संघटना आणि शेतकरी यांनी राज्य शासनाच्या पणन विभागाने दिलेल्या स्थगिती आदेशाची उद्या होळी करुन आंदोलन करणार आहे, असे सदाभाऊ खोत बैठकीत म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जयसिंह मोहीते पाटलांचा राष्ट्रवादीला घरचा आहेर

swarit

राज्य सरकार निर्णय, २५ किल्ले लग्नसमारंभ आणि हॉटेलिंगसाठी भाडेतत्त्वावर देणार

News Desk

“हवंतर बाळासाहेबांचं नाव द्या पण ते काम पूर्ण करा”

News Desk