HW News Marathi
महाराष्ट्र

भगवा सगळ्या विचारांचा, राजकारण विकासाच्या मुद्द्यावरच करणार, रोहित पवारांचे वक्तव्य

अहमदनगर।राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार शिवपट्टण किल्ल्यावर ७४ मीटर उंच भगवा ध्वज फडकवणार आहेत. रोहित पवारांच्या जामखेड मतदारसंघात स्वराज्य ध्वजाची प्रतिष्ठापणा करण्यात येत आहे. भगव्या रंगाचा काही राजकीय पक्षाने फायदा घेत राजकारणासाठी वापर केला परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी भगवा झेंडा उभारण्याचा कार्यक्रम हाती घेतल्यापासून त्यांच्यावर राजकीय वर्तुळातून टीका करण्यात येत होती. परंतु हा संस्कृती जपण्याचा प्रयत्न असून यामध्ये कोणतेही राजकारण नाही असे रोहित पवार यांनी म्हटलं आहे. लहाणपणापासून मंदिर, गड किल्ल्यांवर फिरताना भगव्या रंगातून प्रेरणा घेतली असल्याचे रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रात हा भगव्याचा विचार गेला

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांच्या जामखेडमधील मतदारसंघात ७४ मीटर भगवा ध्वज फडकवण्यात येत आहे. रोहित पवार गेल्या अनेक दिवसांपासून या स्वराज्य ध्वजासाठी मेहनत घेत होते. अखेर दसऱ्याच्या मुहूर्तावर या स्वराज्य ध्वजाची प्रतिष्ठापणा करण्यात येत आहे. रोहित पवार यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये या ध्वजाबाबतच्या टीकांवर उत्तर दिलं आहे. रोहित पवारांनी म्हटलं आहे की, लहानपणापासून मंदिरात गेलो, किल्ल्यांवर कुठेही गेलो तरी स्वतः भगव्या रंगातून प्रेरणा घेतली आहे. मतदारसंघात असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने पाठिंबा दिला. महाराष्ट्रात हा भगव्याचा विचार गेला तेव्हा महाराष्ट्राच्या सगळ्या भागातून आणि सगळ्या जाती, धर्मांतील लोकांनी एकत्रित येऊन याला पाठिंबा दिला असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले आहे.

या रंगाला राजकारणासाठी वापरला गेला

भगवा झेंड्याचा राजकारणापोटी उपयोग करण्यात येत आहे का? असा प्रश्न रोहित पवारांना विचारला असता त्यांनी म्हटलं आहे की, राजकीय दृष्ट्या कार्यक्रम करण्यात येत नाही आहे. जर राजकीयदृष्ट्या कार्यक्रम असता तर इथे पक्षाचे झेंडे, लोगो पाहायला मिळाले असते. परंतु इथे कुठेही पक्ष नाही. इथे फक्त पाठिंबा देणारे कार्यकर्ते आहेत. राजकारणात या रंगाला राजकारणासाठी वापरला गेला. परंतु हा सगळ्यांचा आहे. काही जणांनी विचारले मला मी त्यांना सांगितले हा राजकीय विचार नसल्याचे सांगितले असल्याचे रोहित पवार म्हणाले.राजकारणासाठी भगवा नाही तर आपला भगवा आहे. आपल्या सगळ्यांचा भगवा आहे. सगळ्या विचारांचा भगवा आहे. राजकारण करत नाही आहे. राजकारण करायचे झाल्यास विकासासाठी करेल. ही संस्कृती आहे आणि संस्कृती जपण्याचे आम्ही युवा पिढी प्रयत्न करत आहोत असे रोहित पवारांनी सांगितले.

दरम्यान रोहित पवारांनी टीका करणाऱ्यांवर चांगलाच निशाणा साधला आहे. दुसऱ्या बाजूला असणारे ज्यांनी आतापर्यंत फक्त भगव्याचे भांडवल केले त्यातून फक्त राजकारण आणि युवा पिढीचा राजकारणासाठी वापर केला असावा त्यांच्या पोटामध्ये दुखत असेल तर त्यावर आम्ही काही करु शकत नाही तर सामन्य माणसांच्या मनात विचार काय आहे ते आमच्यासाठी महत्त्वाचे असल्याचे रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नका” रामदास आठवलेंचं भाष्य!

News Desk

भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या वक्तव्यावरून संजय राऊतांचा भाजपला इशारा!

News Desk

राज ठाकरेंच ‘ते’ व्यंगचित्र खरं ठरल, महाराष्ट्रात दहशदवाद्यांचा तळ बनतोय

News Desk