HW News Marathi
महाराष्ट्र

महाविकासआघाडी सरकार माझ्यावर पाळत ठेवतयं, संभाजीराजे छत्रपतींचा गंभीर आरोप!

मुंबई | मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरुन सध्या राजकारण तापलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाजाने, नेत्यांनी सरकारप्रती तीव्र नाराजी व्यक्त केली. तर दुसरीकडे खासदार संभाजीराजे महाराष्ट्रभर दौरे करत मराठा समाजाच्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. यावेळी अनेक जणांच्या ते गाठीभेठीही घेत आहेत. अशा सगळ्या गोष्टी सुरु असताना संभाजीराजे यांनी एक ट्विट केले आहे. यात सरकार त्यांच्यासह पाळत ठेवल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

काय आहे संभाजीराजे यांचं ट्विट?

सरकार माझ्यावर पाळत ठेवत आहे. माझी हेरगिरी करण्याचा नेमकी उद्देश माहित नाही. पण मला हेच लक्षात येत नाहीये की माझ्यासारख्या सरळ आणि प्रमाणिकपणे काम करणाऱ्या एका कार्यकर्त्यावर हेरगिरी करुन काय साध्य होणार आहे?, असे ट्विट संभाजीराजे यांनी केले आहे. नेमकं ते कोणत्या हेरगिरीबद्दल बोलत आहे याचा संभ्रम खऱ्या अर्थाने झाला आहे. यावर आता महाविकासआघाडी सरकारमधील नेत्यांकडून, मंत्र्यांकडून काय प्रतिक्रिया येणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षणाचा कायदा रद्दबातल ठरवल्यानंतर मराठा समाजातील काही संघटनांकडून ईडब्ल्यूएस आरक्षण मराठा समाजाला द्यावं अशी मागणी करण्यात येत होती. त्या मागणीचा सकारात्मक विचार करुन राज्य सरकारनं मराठा समाजाला ईडब्ल्यूएस आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील मराठा विद्यार्थी आणि उमेदवारांना 10 टक्के EWS आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे. शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशात आणि नोकरीमध्ये ईडब्ल्यूएसच्या 10% आरक्षणाचा लाभ मराठा युवकांना मिळणार आहे. राज्य सरकारने याबद्दलचा आदेश आज काढला आहे. सर्वोच्च न्यायालयाने शिक्षण आणि नोकऱ्यांमधील मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाजाला दिलासा देण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून केला जात असल्याचं म्हटलं जात आहे.

संभाजीराजेंनी ठाकरे सरकारला दिला इशारा…

“मुख्यमंत्र्यांना मला आज स्पष्ट सांगायचं आहे. ६ जून हा राज्याभिषेक सोहळा आहे. त्या दिवशी शिवाजी महाराज छत्रपती झाले. जर ६ जूनपर्यंत यावर काहीही कारवाई केली नाही, तर आमची आंदोलनाची भूमिका रायगडावरून जाहीर करू. शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांना असं टाकलं असतं का? त्यामुळे ६ जूनआधी आम्हाला बोलावून निश्चित असा काही कार्यक्रम तुम्ही दिला नाही, तर नंतर आम्ही कोविड बघणार नाही. मी स्वत: ५ मे रोजी निकाल लागला, तेव्हा सगळ्यांना शांत ठेवलं. नाहीतर महाराष्ट्र पेटला असता. पण आम्ही किती शांत बसायचं?,” असा इशारा संभाजीराजेंनी दिला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान नरेंद्र मोदीप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी घेतले केदारनाथचे दर्शन

News Desk

जिजाऊ माँसाहेबांच्या स्वाभिमानी विचारांवरच महाराष्ट्राची वाटचाल राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या जयंतीनिमित्त कृतज्ञतापूर्वक वंदन

News Desk

मुख्यमंत्र्यांना विनंती करतो, पांडुरंगाच्या महापूजेला येऊ नका, बंडातात्या कराडकरांची खोचक विनंती

News Desk