HW News Marathi
महाराष्ट्र

मोदींवर नाराजीचा प्रश्नच नाही, पण…, खासदार संभाजीराजे म्हणाले…

सिंधुदुर्ग | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राजकारण सध्या तापलं आहे. खासदार संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी अनेकदा वेळ मागूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळ दिली नाही, अशी जाहीर नाराजी त्यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे संभाजी छत्रपती मोदींवर नाराज असल्याच्या चर्चा होत्या. परंतु, आपण मोदींवर नाराज नाही, असं सांगत संभाजी छत्रपती यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

संभाजी छत्रपती आज (३१ मे) सिंधुदुर्गाच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर मी नाराज नाही. नाराजीचा प्रश्नच येत नाही. आमच्या भावना त्यांना सांगणं काही चुकीचं नाही. मला त्यांना वैयक्तिक भेटायचं नव्हतं, तर समाज म्हणून त्यांना भेटायचं होतं. समाजाचे प्रश्न त्यांच्यासमोर मांडायचे होते, असं सांगतानाच मोदींनी मला राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा सदस्य म्हणून नेहमीच सन्मान दिला, असं संभाजी छत्रपती यांनी सांगितलं. मला मोदींना वैयक्तिक भेटायचं नाही. सर्व खासदारांनी मिळून त्यांना भेटावं अशी इच्छा आहे, असंही ते म्हणाले आहेत.

…तर आम्ही कोविड वगैरे बघणार नाही

7 जूनपर्यंत जर सरकारनं मी सांगितलेल्या पाच गोष्टींवर निर्णय घेतला नाही, तर आम्ही कोविड वगैरे काही बघणार नाही, असा इशाराच संभाजीराजे छत्रपतींनी दोन दिवसांपूर्वी दिला होता. 6 जूनपर्यंत मी अल्टिमेटम देत आहे. त्यानंतर रायगडावरून आंदोलनाला सुरुवात करणार असल्याचा निर्धार संभाजीराजेंनी व्यक्त केला होता. त्यावर त्यांना विचारण्यात आलं असता, मी सरकारला कोणताही अल्टिमेटम दिला नाही. शिवराज्यभिषेक सोहळा असतो. त्यामुळे त्या दिनाचं औचित्य साधून सरकारने मराठा समाजाच्या या पाच मागण्यांवर निर्णय घ्यावा ही अपेक्षा आहे, असं ते म्हणाले.

अजित पवार आरक्षणाप्रश्नी सकारात्मक

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मराठा आरक्षण प्रश्नी सकारात्मक आहेत. त्यांनी माझी पत्रकार परिषद झाल्यानंतर त्याच दिवशी तसं जाहीर ही केलं आहे. अजून आठ-नऊ दिवस आहेत, असं ते म्हणाले होते. त्यामुळे चर्चेतून मार्ग निघू शकतो, असं संभाजीराजेंनी स्पष्ट केलं आहे.

मोदींना ४ वेळा भेटीसाठी पत्र लिहिलं

मराठा आरक्षणासाठी राज्यभरात आंदोलन करण्यासाठी आग्रही असलेल्या भाजपला संभीजीराजे छत्रपती यांनी चांगल्याच कानपिचक्या दिल्या आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट हवी होती. त्यासाठी मी चारवेळेला पंतप्रधान मोदींना पत्रही दिले. मात्र, अद्याप त्यांनी मला भेटीसाठी वेळ दिलेली नाही, असे सांगत संभाजीराजे छत्रपती यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नाना पटोलेंसारख्या लहान माणसावर मी बोलणार नाही ! – शरद पवार

News Desk

‘स्वप्न पाहण्याचा सर्वांनाच अधिकार, पण…’, नाना पटोलेंच्या मुख्यमंत्रिपदाच्या इच्छेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

News Desk

महाराष्ट्रातील दोन महिलांना ‘राष्ट्रीय नारी शक्ती पुरस्कार’ जाहीर

swarit