HW News Marathi
महाराष्ट्र

“आमच्या वर्गातला एक मुलगा अभ्यास करायचा नाही, पण नंबर वन यायचा, मुख्यमंत्र्यांचं तसंच आहे”

मुंबई | देशातील १३ मुख्यमंत्र्यांच्या यादीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नंबर एकवर आले आहेत. यारुन एकीकडे त्यांचं कौतुक होत असताना मनसेने मात्र त्यांना डिवचलं आहे.   “आमच्या वर्गात एक मुलगा होता, तो अभ्यास करायचा नाही, पण तो वर्गात नंबर वन यायचा. एकतर तो खूप हुशार असेल किंवा मग कॉपी करुन किंवा मॅनेज करुन पास झाला असेल, असंच मुंख्यमंत्र्यांचं आहे” अशा शब्दात मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे  यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. देशातील 13 राज्यांमधून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नंबर वन ठरल्याचा अहवाल नुकताच समोर आला होता.

काय म्हणाले संदीप देशपांडे?

‘प्रश्नम’ या संस्थेने जाहीर केलेल्या त्रैमासिक अहवालात भारतातील 13 राज्यांमधून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अव्वल ठरले आहेत. त्यावर बोलताना संदीप देशपांडे म्हणाले, की “आमच्या वर्गात एक मुलगा होता, तो अभ्यास करायचा नाही, पण तो वर्गात नंबर वन यायचा. एकतर तो खूप हुशार असेल किंवा मग कॉपी करुन किंवा मॅनेज करुन पास झाला असेल, असंच मुंख्यमंत्र्यांचं आहे. नंबर एक असण्यासाठी काम करावं लागतं, दीड वर्षात काय केलं?” असा सवाल संदीप देशपांडे यांनी विचारला आहे.

“आपसातली लफडी बाजूला ठेवा”

सरकारने जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, वेठीस धरू नये. आपसातली लफडी बाजूला ठेवावी, रुग्णसंख्या कमी झाली आहे. जनतेला वेठीस का धरता? निर्बंध का उठवत नाही? असा प्रश्न संदीप देशपांडेंनी विचारला. विषय आक्रमक हेण्याचा नाही, सरकारला परिणाम भोगावे लागणार, मुख्यमंत्र्यांना पत्र दिलंय की रेल्वे सुरू करा, पण त्यांना घरातच बसून राहायचंय, अशी टीकाही देशपांडेंनी केली.

“निर्बंध असतील, तर लसीकरणाचा उपयोग काय?”

ज्यांच्या दोन लसी झाल्या त्यांना निर्बंधातून बाहेर काढा ही आमची मागणी आहे. लसीकरण झालं तरी निर्बंध असतील, तर लसीकरणाचा उपयोग काय? या सरकारने काय कामं केली? शाळेच्या फीचा प्रश्न आहे, व्यापारी नाराज आहेत, हे वसुली सरकार हफ्तेखेरी करतंय. दुकानं बंद, रेल्वे बंद, लोक घरात, वेठीस धरण्याचं काम होतंय, असंही संदीप देशपांडे म्हणाले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…तर नारायण राणेंची अटक ही बेकायदेशीरच मानायला हवी”

News Desk

मुंबईत गेल्या पाच वर्षांपासून महिला अपहरणात वाढ | मुख्यमंत्री

News Desk

जळगावात शिवसेनेचा डंका, महापौर निवडणुकीत बाजी मारत भाजपला धक्का

News Desk