HW News Marathi
महाराष्ट्र

“कोरोनाची फक्त भीती दाखवू नका, तुमची ती नाईट लाईफ, लोकांना फक्त करो ना”, मनसेचा सरकारला सवाल!

मुंबई | “मुख्यमंत्री, कोरोना काय फक्त रात्री फिरतो का? दिवसा होत नाही का? नाईट कर्फ्यूचं कारण काय आहे?” अशा प्रश्नांची सरबत्ती करत मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी रात्रीच्या संचारबंदीवर टीकेची झोड उठवली आहे. “तुम्ही नाईट पार्ट्या करता, ते चालतं, मग लोकांना बंधन का? कोण कुठे पार्ट्या करतं, हे सर्वांना माहीत आहे” असा निशाणाही देशपांडेंनी ठाकरे सरकारवर साधला आहे.

काही दिवसांपूर्वी उद्योगपतींना महाबळेश्वरला जाण्याची परवानगी कशी दिली? त्यांच्यावर काय कारवाई झाली?” असे सवाल संदीप देशपांडे यांनी सरकारला विचारले आहेत. “या संपूर्ण वर्षात लोकांचा कणा मोडला आहे. हॉटेल व्यावसायिक त्रस्त आहेत. प्रत्येक वेळी कोरोनाची भीती दाखवत आहात, तर अमेरिकेसारखं पॅकेज द्या” अशी मागणीही संदीप देशपांडे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना केली आहे.

तर, संदीप देशपांडे यांनी ट्विट देखील केले आहे. यात त्यांनी “कोरोनाची फक्त भीती दाखवू नका. तुमची ती नाईट लाईफ, लोकांना फक्त कोरोना, असं आहे” असा टोला देशपांडेंनी लगावला आहे. “या लॉकडाऊनच्या काळात कोणी नाईट लाईफ एन्जॉय केली, हे सर्वांना माहीत आहे, समजने वाले को इशारा काफी है, नाव घ्यायची गरज नाही” असा इशारा त्यांनी दिला. “व्हीआयपी पार्ट्यांना सवलत दिली जाते, गरिबांनी हॉटेलमध्ये जाऊन जेवायचं नाही, हे कुठलं लॉजिक आहे?” असा सवालही संदीप देशपांडेंनी विचारला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…अॅमेझॉनचे पार्सल परत पाठवले”, उद्धव ठाकरेंचा भगतसिंग कोश्यारींना टोला

Aprna

“… तर सरकारवर दबाव आणण्याशिवाय पर्याय नाही”- अण्णा हजारे

News Desk

आदित्य ठाकरेंचं मोठं प्लॅनिंग, नेमकं काय आहे साहसी पर्यटन धोरण?

News Desk