HW News Marathi
महाराष्ट्र

जनतेची जबाबदारी घ्यायलाच तुम्हाला सरकारमध्ये बसवलं आहे – संदीप देशपांडे

मुंबई | राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी राज्यात पूर्ण क्षमतेने एसटी बसेस सुरु करण्याची घोषणा केली आहे. यावरुन मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी पुन्हा एकदा आघाडी सरकारवर टीका केली आहे“अनिल परब एसटीच्या सर्व प्रवाशांची जबाबदारी घेणार आहेत का?” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

अनिल परब हे १०० टक्के एसटी सेवा सुरु करण्याच्या तयारीत आहेत. मात्र ते एसटीच्या सगळ्या प्रवाशांची जबाबदारी घेणार आहेत का? लोकांनी सहा महिने कोमट पाणी प्यायले तरीही कोरोना झाला, ती जबाबदारी कुणाची होती? लोकांनी तुम्हाला निवडून दिलं आहे. त्यामुळे जनतेनी जबाबदारी घ्यायलाच तुम्हाला सरकारमध्ये बसवलं आहे, हे लक्षात असू द्या,” अशी टीका संदीप देशपांडे यांनी केली आहे.

एसटी बसेसला परवानगी देताना सर्व गोष्टींचा विचार करुन आम्ही पूर्ण क्षमतेने एसटी चालवण्याचा निर्णय घेतला. हे करताना बसमध्ये मास्क लावणं बंधनकारक आहे. प्रत्येक फेरीला बसेसचं निर्जंतुकीकरण केलं जातं आहे. प्रवाशांसाठी देखील बसेसमध्ये सॅनिटायझर ठेवण्यात आलं आहे. प्रत्येक प्रवाशाने हात सॅनिटाईझ केल्यावरच बसमध्ये प्रवेश करायचा आहे. सुरक्षेबाबत सर्व खबरदारी घेऊन आम्ही पूर्ण क्षमतेने बस सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.” असे अनिल परब यांनी सांगितलं होतं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बाळासाहेबांची अन्यायाविरुद्ध लढण्याची शिकवण, विचार, वारसा घेऊन आमची वाटचाल! –  मुख्यमंत्री

Aprna

अनेक आंदोलनाचा साक्षी असलेल्या लिंबाच्या झाडाचा अखेर अंत!

News Desk

रेल्वे स्थानकाच्या तिकीट खिडकीशेजारी महापालिकेचे स्टॉल्स तैनात!

News Desk