HW News Marathi
देश / विदेश

सांगलीची सीमा बंद ! बाहेरच्यांना नो एंट्री !

सांगली| मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महाराष्ट्र लाॅकडाऊन करण्याची घोषणा केली आहे. उद्या सकाळपासून महाराष्ट्रात कलम १४४ लागू केले जाणार आहे,त्या पार्श्वभूमीवर ४ पेक्षा जास्त लोक समुहाने जमू शकत नाहीत. त्याचपद्धतीने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आता कठोर पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत . महाराष्ट्र राज्यच्या सीमा म्हणजे एंट्री-एक्झिट बंद करणार असल्याचे संकेत दिले आहेत.

महाराष्ट्राची सीमा बंद करणार की नाही याविषयी सरकार निर्णय घेईलचं मात्र सांगली आणि साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दोन्ही जिल्ह्यांच्या सीमा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुणे-मुंबईकरांना या जिल्ह्यांमध्ये एंट्री मिळणार नाही.सांगली जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सांगली जिल्ह्यांच्या सीमा बंद केल्या असून पुणे,मुंबई ,कर्नाटकमधून कोणालाही सांगली जिल्ह्यात प्रवेश करता येणार नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘CM नाही PM बदला’, काँग्रेस कडून भाजपवर बोचरी टीका!

News Desk

 नॅशनल हेराल्ड प्रकरणात ED ने यंग इंडियाचे कार्यालय केले सील

Aprna

“महाराष्ट्र आणि बंगालने दाखवलंय, मोदींचा पराभव करतो येतो!”

News Desk