HW News Marathi
महाराष्ट्र

‘आंचल गोयल यांना पदभार घेण्यास कोण रोखत होतं?’ संजय जाधवांनी केला खुलासा

परभणी | आयएएस अधिकारी आंचल गोयल यांच्या नियुक्ती वरून आता चांगलंच राजकारण पेटलं आहे. आंचल गोयल शेवटी परभणीच्या आयएएस अधिकारी म्हणून अखेरी रुजू झाल्या आहेत. मात्र गोयल यांना पदभार घेण्यास कोण रोखत होतं? याविषयी पहिल्यांदाच उघड वक्तव्य करण्यात आलं आहे. जिल्ह्यात कलेक्टर बदलायचा होता. मी फक्त मुख्यमंत्र्यांकडे शिफारस केली होती. राष्ट्रवादीने एवढं रान पेटवलं जणू काही मोठा अपराधच केला होता, असं वक्तव्य शिवसेनेचे परभणीचे खासदार संजय जाधव यांनी केलं आहे.

काय म्हणाले जाधव?

आंचल गोयल यांच्या रुजू होण्यावरून अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत. या सगल्यावर आता संजय जाधव यांनी पडदा पडला आहे. “आमच्याही भावना अनावर होतात हे लक्षात ठेवा. शेवटी काही मर्यादा असतात. कुठपर्यंत शांत बसायचं, कुठपर्यंत सहन करायचं. माकडीण सुद्धा स्वत:ला बुडायची वेळ आल्यावर लेकराला पाया खाली घालते हे लक्षात ठेवा. तर राष्ट्रवादीला आम्ही केव्हाही पायाखाली घालू शकतो हे तुम्हाला सांगतो. शेवटी आम्ही आता सहनशीलतेच्या पलिकडे गेलो आहोत. काल जिल्ह्यात कलेक्टर बदलायचा होता. मी फक्त मुख्यमंत्र्यांकडे शिफारस केली होती. राष्ट्रवादीने एवढं रान पेटवलं जणू काही मोठा अपराधच केला होता. तुम्हाला सगळं जमतं. म्हणजे आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्यांचं बघायचं वाकून अशी अवस्था राष्ट्रवादीवाल्यांची आहे. तरी देखील मुख्यमंत्र्यांचा आदेश आम्ही शिरसावंद्य मानला. जे काही आदेश येईल ते मान्य केलं. पण प्रत्येक गोष्टीत सध्या खाजवाखाजवी सुरू आहे. ही वस्तुस्थिती आहे” असं परभणीचे खासदार संजय जाधव म्हणाले आहेत.

काय आहे प्रकरण?

परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर ३१ जुलै रोजी सेवानिवृत्त झाले. त्यानंतर परभणीच्या जिल्हाधिकारी म्हणून आंचल गोयल यांची नियुक्ती करण्यात आली. त्यादिवशी त्या पदभार स्वीकारणार होत्या. मात्र, सामान्य प्रशासन विभागाने त्यांना पदभार घेऊ नका असं सांगितलं. त्यानंतर ही नियुक्ती थांबवण्यात पालकमंत्र्यांची नावं आली होती, असं नवाब मलिक यांनी सांगितलं. दरम्यान, आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन निर्णय घेतला की आंचल गोयलच परभणीच्या जिल्हाधिकारीपदी असतील. आंचल गोयल यांना रितसर तिथले अतिरिक्त जिल्हाधिकारी त्यांना पदभार देतील, असं मलिक यांनी सांगितलं आहे.

आंचल गोयल यांची परभणी जिल्हाधिकारी पदी नियुक्ती होताच परभणी जिल्ह्यातील सत्तारुढ पक्षाचे काही नेते मंडळींनी सरकार दरबारी स्वतःची प्रतिष्ठा पणास लावली. थेट मंत्रालयात धाव घेत आंचल गोयल यांना पदभार घेण्यापासून दूर ठेवण्याचे प्रयत्न झाल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर आंचल गोयल यांच्याऐवजी अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश काटकर यांच्याकडे जिल्हाधिकारी पदाचा पदभार द्यावा, असे आदेश शनिवारी सायंकाळी सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव अजित पाटील यांनी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांना दिले. मुगळीकर यांनी आपला पदभार राजेश काटकर यांच्याकडे सोपवून निवृत्ती घेतली.

दरम्यान, आंचल गोयल यांनी जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारावा म्हणून परभणीच्या जागरुक नागरिक आघाडीने आंदोलन छेडलं होतं. आंचाल गोयल यांना पदभार देण्यात यावा अशी मागणी आंदोलकांनी केली होती.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कागदी घोडे नाचऊ नका ! -खा.अशोक चव्हाण 

News Desk

महाविकासआघाडी सरकार पाडण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले,गृहमंत्री अनिल देशमुखांचा खळबळजनक खुलासा !

News Desk

‘बरं झालं रश्मी ठाकरेंना फडणवीसांच्या पत्नीची उपमा नाही दिली, नाहीतर डान्सिंग डॉलची प्रतिमा झाली असती’

Aprna