HW News Marathi
महाराष्ट्र

वाझे प्रकरणाची नाळ शिवसेनेशी? कॉंग्रेस नेत्याने उपस्थित केला सवाल!

मुंबई | राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरुन सरकारने मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी करत पोलिस दलात मोठे फेरबदल केले. पण असे असतानाही शिवसेनेकडून मात्र परमबीर सिंग यांचे कौतुक होत आहे. आजच्या (१९ मार्च) सामना अग्रलेखातून त्यांचे कौतुक केले असून यावरुनच कॉंग्रेसने शिवसेनेला सुनावले आहे.

कॉंग्रेसचे नेते संजय निरूपम यांनी ‘वाझे प्रकरण हे एक सत्ता प्रायोजित हप्ता वसुली कांड असल्याचे चित्र दिसत आहे. याची नाळ शिवसेनेशी तर जोडली गेली नाही ना?’ असा थेट सवाल उपस्थित केला आहे.

काय आहे संजय निरुपम यांचे ट्विट?

‘शिवसेना परमबीर सिंग यांचा जयजयकार करत आहे. पण काल राष्ट्रवादीचे नेते आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मात्र तत्कालीन आयुक्तांकडून चूका झाल्या असे म्हटले. त्यामुळे सरकारमध्ये हा विरोधाभास निर्माण झाला आहे, अशी प्रतिक्रिया निरुपम यांनी ट्वीट करत व्यक्त केली आहे. तसेच या विरोधाभासाने सरकारची प्रतिमा अजून खराब होईल, असे सुद्धा त्यांनी यावेळी म्हटले आहे. आतापर्यंत वाझे प्रकरण हे एक सत्ता प्रायोजित हप्ता वसुली कांड असल्याचे चित्र दिसत आहे. याची नाळ शिवसेनेशी तर जोडली गेली नाही ना?’, असा प्रश्नही विचारत निरुपम यांनी शिवसेनेवर ताशेरे ओढले आहेत.

काय लिहिले आहे सामना अग्रलेखात?

अंबानींच्या घराबाहेर सापडलेली स्फोटके,मनसुख हिरेन आणि त्यानंतर पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्याभोवती फिरणारे संशयाचे वारे या सगळ्यामुळे आरोपांची एक वावटळच गेले काही दिवस राज्यात उठली. हे सगळे प्रकरण हाताळण्यात मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग हे अपयशी ठरत असल्याचा आरोप झाल्याने त्यांची उचलबांगडी करण्यात आली. पण तरीही शिवसेनेकडून मात्र त्यांचे कौतुक केले जात आहे.

परमबीर सिंग यांची आयुक्त पदावरुन बदली झाली म्हणजे ते काही गुन्हेगार ठरत नाहीत, त्यांनी अत्यंत कठीण काळात आयुक्तपदाची सूत्रे हातात घेत, कोरोना संकटाशी लढण्यासाठी पोलिसांमध्ये जोश निर्माण केला, असे म्हणत सामनामधून सिंग यांची स्तुती केली आहे. इतकेच नाही तर सुशांत सिंग राजपूत प्रकरणात त्यांनी धैर्याने काम करत सीबीआय पेक्षाही चांगल्या प्रकारे या प्रकरणाचा तपास केला. टीआरपी घोटाळ्याची फाईल सुद्धा त्यांच्याच काळात उघडण्यात आली, त्यामुळेच परमबीर सिंग यांच्यावर दिल्लीतील एका विशिष्ट लॉबीचा राग आहे, असे म्हणत सामनामधून परमबीर सिंग यांची पाठराखण करण्यात आली आहे. पण राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मात्र एका मुलाखतीत परमबीर सिंग यांच्याकडून अक्षम्य चूका झाल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या विरोधाभासावर संजय निरुपम यांनी टीका केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

व्हिसा उल्लंघन प्रकरणी १५६ परदेशी नागरिकांवर गुन्हे

News Desk

लतादिदींच्या निधनानं संगीतविश्वाला पडलेलं अद्भूत स्वप्न भंगलं; अजित पवारांनी वाहिली श्रद्धांजली

Aprna

मंत्री हसन मुश्रीफ रुग्णालयात, बॉम्बे हॉस्पिटलमध्ये तीन दिवसांपासून उपचार!

News Desk