HW News Marathi
महाराष्ट्र

संजय राऊत यांचं किरीट सोमय्यांना पत्र

मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी आजवर महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर आरोप केले आहेत. यावरूनच संजय राऊत यांनी आता सोमय्या यांना पत्र लिहीत त्यांचं कौतक केलंय. राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि विरोधी पक्षात सध्या केंद्रीय यंत्रणांकडून सुरू असलेल्या कारवायांवरून आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत. भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणांची उघड केली, हे राष्ट्रावर उपकार असल्याचं म्हणत संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांचं कौतूक केलंय. या आशयाचं पत्र राऊत यांनी सोमय्यांना पाठवल्याचं समोर आलंय.

भ्रष्टाचारविरुद्धच्या आपल्या लढ्यास ‘बळ’ मिळावे…….

किरीट सोमय्या यांनी स्वत: हे पत्र शेअर करत संजय राऊत यांचे आभार मानले. “माननीय संजय राऊत यांनी माझा “भ्रष्टाचार विरोधी मिशनचे कौतुक केले, मी त्यांचा आभारी आहे…..” असं म्हणत सोमय्या त्यांनी हे पत्र शेअर केलं आहे. “भ्रष्टाचार, शासकीय पैशांचा अपहार अशी अनेक प्रकरणे आपण सार्वजनिकरीत्या उघड केली आहेत. हे राष्ट्रावर उपकारच झाले. आपण केलेल्या तपासकार्यामुळे महाराष्ट्रातील अनेक लोकप्रतिनिधींना तुरुंगात जावे लागले. भ्रष्टाचारविरुद्धच्या आपल्या लढ्यास ‘बळ’ मिळावे…….. ” असं संजय राऊत यांनी या पत्रात म्हटलं आहे. तर आपण लवकरच आपण यावर प्रतिक्रीया देऊ असंही सोमय्या यांनी सांगितलंय.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुरामुळे गडचिरोली जिल्ह्यातील १८ तर भंडारा जिल्ह्यातील ७८ रस्ते वाहतुकीकरिता बंद

Aprna

सरकारी कार्यालयावर भगवा फडकवल्याने देशाची अखंडता धोक्यात येऊ शकते – गुणरत्न सदावर्ते

News Desk

‘सारथी’ संस्थेला स्वायत्तता देण्याची उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा

News Desk