HW News Marathi
महाराष्ट्र

“तुम्हाला अडचण असेल तर….”, मुख्यमंत्र्यांवरच्या गंभीर आरोपावरुन शिवसेनेचा कॉंग्रेसला पलटवार

मुंबई | महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्यावर मुख्यमंत्री आणि गृहखात्याकडून पाळत ठेवली जात असल्याच्या गंभीर आरोप केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठोपाठ शिवसेनेनंही पटोले यांच्या विधानावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पटोले यांना काही बोलायचं असेल तर खासगीत बोलावे, चव्हाट्यावर बोलू नये, असा सल्लाच शिवसेनेचे प्रवक्ते अरविंद सावंतयांनी दिला आहे.

न्यूज १८ लोकमतशी बोलत असताना अरविंद सावंत यांनी नाना पटोले यांच्या विधानावर आश्चर्य व्यक्त करत नाराजी व्यक्त केली आहे. ‘नाना पटोले हे एका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, ते विधानसभा अध्यक्ष राहिले आहेत त्यामुळे आपण काय बोलतोय याचं भान राहिलं पाहिजे. नाना पटोले यांना जे काही बोलायचं आहे ते त्यांनी खाजगीत बोलावं चव्हाट्यावर बोलू नये, असा सल्लावजा टोला सावंत यांनी लगावला आहे.

तुम्हाला काही अडचण आहे तर…

‘तुम्हाला काही अडचण आहे तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना किंवा बाळासाहेब थोरात यांना सांगा पण असं वक्तव्य करणे योग्य नाही. अशा लोकांमुळे मुख्यमंत्र्यांची प्रतिमा खराब होणार नाही. याचा विचार केला पाहिजे, त्यांना कसं थांबवायचं हे आता त्याचा पक्ष आणि मुख्यमंत्री निर्णय घेतील, असंही सावंत म्हणाले आहेत.

दरम्यान, नाना पटोले यांनी आपल्याच सरकारवर पाळत ठेवण्याचा केलेला आरोप हा महाविकास आघाडीला सुरुंग लागत असल्याची भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे, अशी माहिती समोर आली आहे. नाना पटोले यांच्यावर अशा कोणत्याही प्रकारची पाळत ठेवण्यात आली नाही. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे काँग्रेसच्या नेत्यांसोबत बोलणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांत नाना पटोले यांच्या सातत्याने आरोप होत असल्यामुळे राष्ट्रवादीने नाराजी व्यक्त केली आहे.

काय म्हणाले नाना पटोले?

‘मुख्यमंत्री आणि गृहमंत्रिपदाचा त्यांच्याकडे कार्यभार आहे. त्यामुळे यंत्रणांना सर्व रिपोर्ट त्यांना द्यावे लागतात. राज्यात कुठे काय चालू आहे, आंदोलनं कुठे होत आहे. याबद्दलची प्रत्येक अपडेट त्यांना द्यावी लागत असतात. मी कुठे काय करतो, हे सुद्धा त्यांना माहीत असते’, असा दावाच पटोले यांनी केला आहे. तसंच, ‘राज्यात काँग्रेस वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. पक्ष आणखी बळकट करण्याचा आम्हाचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रात काँग्रेस उभी राहत आहे, हे त्यांना माहीत आहे. त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकत चालली आहे. याबद्दल त्यांना माहिती असून ते कुठे ना कुठे आपल्याला पिंजऱ्यात आणायचा प्रयत्त करणार’ असंही पटोले म्हणाले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लोकमान्य टिळक आणि रायगडावरील शिवसमाधी

Aprna

शिवसेना अजून बाल्यावस्थेत नारायण राणेंची पुन्हा टीका!

News Desk

‘टॉनिक’च संपल्यामुळे बाळसे म्हणून दिसणारी सूज उतरली, सामनातून भाजपवर टीका

News Desk