HW News Marathi
महाराष्ट्र

एखाद्या विषयावर मतभेद असू शकतात पण महाविकासआघाडीत नाराजी नाही, राऊतांचं स्पष्टीकरण

मुंबई | महाविकास आघाडी सरकारमध्ये काहीतरी बिघाडी असल्याचं अनेकदा म्हटलं गेलं. काही वेळा काही उदाहरणांवरुन तसं आहे असं वाटलं ही. मात्र, महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी सगळं काही सुरळीत असल्याचं कायम म्हटलं आहे. यावरचं आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही भाष्य केले आहे. आझ (२९ जून) पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महाविकास आघाडीत एखाद्या विषयावर मतभेद असू शकतात; पण नाराजी अजिबात नाही, असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज स्‍पष्‍ट केले. विरोधकांनी महाविकास आघाडीची चिंता करु नये, असा टाेलाही त्‍यांनी लगावला आहे.

काल (२८ जून) राऊत यांनी शरद पवार यांची भेट घेतली हाेती. याबाबत बाेलताना ते म्‍हणाले, प्रत्येक भेटीमागे राजकारण दडलय असा अर्थ काढण चुकीचे आहे. विरोधकांनी महाविकास आघाडीची चिंता करु नये. तिन्ही पक्षाच सरकार व्यवस्थित सुरु आहे. दोन वर्षात तिन्ही पक्षांनी उत्तम कामं केली आहेत. आमदार प्रताप सरनाईक आणि अनिल देशमुख यांची बाजू समजून घेण गरजेच आहे,असेही राऊत यांनी सांगितले.

सध्‍या महाविकास आघाडी सरकार मध्ये सर्व काही अलबेल नसल्याच्या चर्चा सुरु आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी म्हाडाची घरे टाटा हॉस्‍पिटलला देण्याचा निर्णय स्‍थगित केला होता. यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर शरद पवार नाराज असल्याची चर्चा होती. यावर खुलासा करताना राऊत म्‍हणाले, आघाडी सरकारमधील मित्रपक्षात नाराजी नाही. मतभेद असू शकतात.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या गेल्या दोन-तीन दिवसांत मातोश्री, वर्षा आणि सिल्व्हर ओक या बंगल्याच्या वाऱ्या पाहायला मिळत आहेत. राऊत यांच्या या फेऱ्यांवरुन शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य सरकारच्या कारभारावर नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. या बाबत विचारलं असता शरद पवार नाराज या चर्चेला अर्थ नाही. तिन्ही पक्षांचं व्यवस्थित सुरु असल्याचा दावा राऊत यांनी पुन्हा एकदा केलाय. काल मुख्यमंत्री आणि पवारांच्या भेटीनंतर आज राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला.

शरद पवार नाराज या चर्चेला अर्थ नाही. तिन्ही पक्षांचं व्यवस्थित सुरु आहे. केव्हातरी पूर्णविराम द्यावा लागेल. सरकारला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. मनुष्य म्हटल्यावर मतभेद असू शकतात पण नाराज कुणीच नाही, असं राऊत यांनी आवर्जुन सांगितलं. अहमदाबादमध्ये कुणालाही भेटल्याचा इन्कार शरद पवार यांनी केलाय. मोदी-ठाकरे यांच्यात चर्चा झाली असली तरी वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही. या दोन्ही बैठकांमध्ये काहीही राजकारण नसल्याचा दावाही राऊत यांनी यावेळी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सर्वोच्च न्यायालयाचा अर्णब गोस्वामींना झटका!

News Desk

दप्तराविना शाळा! अनोख्या उपक्रमातून परिवर्तनाचे धडे

News Desk

महानगर पालिकेच्या सदनिकेत कोरेगाव भीमा दंगलीतील विस्थापित कुटुंबाचे पुनर्वसन

News Desk