HW News Marathi
महाराष्ट्र

संजय राऊत बिथरले आहेत त्यांना मानसोपचार तज्ञाला दाखवण्याची गरज, शेलारांचा खरमरीत टोला

मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात आणि भाजपच्या नेत्यांमध्ये कायम वाद हा होतच असतो. त्यात राऊत यांच्या पत्नी वर्षा संजय राऊत यांना सक्तवसुली ईडीने नोटीस बजावली. त्यानंतर राऊतांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेत भाजपवर हल्ले चढवले होते. तसंच आजच्या सामना अग्रलेखातून त्यांनी भाजपचा जोरदार समाचार घेतला. राऊतांनी केलेली टीका भाजपच्या चांगलीच जिव्हारी लागली. भाजपनेही राऊतांना जशास तसं उत्तर दिलंय. ईडीची नोटीस आल्यानंतर राऊत बिथरलेत, त्यांना मानसोपचार तज्ज्ञाची गरज असल्याची बोचरी टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे.

“संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीची नोटीस आल्यापासून संजय राऊत ज्याप्रकारे लिहित आहेत किंबहुना वक्तव्यं करत आहे त्यावरुन ते बिथरल्याचं दिसत आहेत. त्यांना तात्काळ मानसोपचार तज्ज्ञाला दाखवण्याची गरज आहे”, अशी टीका शेलार यांनी केलीय.“संजय राऊतसाहेबांना माझा मैत्रीचा सल्ला असेल की त्यांनी लवकरात लवकर एखाद्या चांगल्या मानसोपचार तज्ज्ञाकडून उपचार करुन घ्यावेत म्हणजे ते ठीक होतील”, असं म्हणत शेलारांनी राऊतांवर शरसंधान साधलं. राऊतांची गेल्या काही दिवसांपासूनची विधाने पाहता त्यांना भाजपद्वेषाने पछाडलंय, असं शेलार म्हणाले आहेत.

“संजय राऊत यांची वक्तव्ये पाहिली असता त्यांना भाजपविरोधाशिवाय काहीच दिसत नाही, हे स्पष्ट होतं. माझं त्यांना मित्र म्हणून सल्ला असेल की त्यांनी तात्काळ एखाद्या चांगल्या डॉक्टरकडून उपचार करुन घ्यावा. त्यासाठी महापालिकेने प्रभादेवीला चांगलं हॉस्पिटल सुरु करावं”, असा टोला शेलार यांनी लगावला. “संजय राऊत यांनी लिहिलेल्या अग्रलेखावर काय प्रतिक्रिया देणार?, मला सेनेची कीव येते. शिवसेना सत्तेसाठी सुसंस्कार, सुसंस्कृतपणा सगळं विसरुन गेली आहे. सत्तेच्या लालसेपायी शिवसेनेने स्वाभिमान गहाण ठेवलाय”, अशा शब्दात शेलारांनी सेनेवर टीकास्त्र सोडलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दानवेच महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष राहणार | चंद्रकांत पाटील

News Desk

२० जानेवारीपर्यंत ५० % विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत महाविद्यालये सुरू करण्याचा विचार – उदय सामंत 

News Desk

अफवा पसरवू नका, राजकारण करू नका ! जयंत पाटील यांनी भाजपच्या संबित पात्रांना सुनावले

News Desk