HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेनेचे नगरसेवक राष्ट्रवादीत गेले म्हणजे ते अजित पवारांनी फोडले असं होत नाही

मुंबई | महाविकास आघाडी सरकारमध्ये सध्या समन्वय नसल्याचे म्हटले जात असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सगळं काही ठीक असल्याचे म्हटले आहे.

पारनेरचे नगरसेवक राष्ट्रवादीत गेले, याचा अर्थ ते अजित पवारांनी फोडले असा होत नाही, ते पूर्णपणे स्थानिक राजकारण आहे, असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीत सारे काही आलबेल असल्याचा दावा केला आहे. आज (७ जुलै) पत्रकार परिषदेत ते बोलत होते.मुख्यमंत्र्यांचे सर्व बारीक-सारीक गोष्टींकडे लक्ष आहे. मुंबई पोलिसातील बदल्यांचे कुणी राजकारण करु नये, त्यावरुन काही वाद नाही, असे देखील त्यांनी सांगितले.

महाविकास आघाडीच्या नेतृत्वात मतभेद नाहीत. देवेंद्र फडणवीस जे शब्द वापरत आहेत त्या शब्दांचा अर्थ तितकासा खरा नाही, तीन प्रमुख पक्षांनी हे सरकार बनवलले आहे, ही खिचडी नाही, असे उत्तर राऊत यांनी फडणवीसांना दिले आहे. तसेच, महाविकास आघाडी सरकारमध्ये कुरबुरी नाहीत. अंतर्विरोध, मतभेद हे शब्द महाविकासआघाडीत नाहीत. हे सरकार ५ वर्षे चालणार असल्याचा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. काल (६ जुलै) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची संजय राऊत यांनी मुलाखत घेतली असून लवकरच ती प्रसारित होणार असल्याचेही त्यांनी सांगितले

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अर्थसंकल्प म्हणजे तिघाडीचा किमान समान फसवणूक कार्यक्रम – आशिष शेलार

News Desk

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून ‘भारतीय सैन्य दिना’च्या  सर्वांना शुभेच्छा!

News Desk

मोदी सरकारविरुध्द काँग्रेसचा अतिविराट मोर्चा

News Desk