HW News Marathi
Covid-19

ही वेळ सरकार आणि विरोधी पक्ष यांनी हातात हात घालून महाराष्ट्राची सेवा करण्याची आहे

मुंबई | देशाच्या निवडणूक आयोगाने आज (१ मे) महाराष्ट्र दिनी एक उत्तम निर्णय दिला. महाराष्ट्र राज्याच्या विधानपरिषदेच्या ९ जागांसाठी ज्या निवडणूका होणार होत्या त्या कोरोनामूळे पुढे ढकलण्यात आल्या होत्या.मात्र, आता त्या घेण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे.त्याबद्दल मी शिवसेनेतर्फे केंद्र सरकारचे आभार मानतो, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले.

महाराष्ट्रात जे अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले होते त्याला आता पुर्णविराम लागला आहे.उगाच भ्रम निर्माण होत होते ते ही आता नष्ट झाले.२७ ने नंतर उद्धव ठाकरे विधीमंडळाचे सदस्य झाले नाहीत तर त्यांना राजीनामा द्यावा लागेल का? सरकार पडेल का? राष्ट्रपती राजवट येईल का? अशा अने गोष्टी पसरवल्या गेल्या. जनतेच्या मनात भय निर्माण झाले. पण शेवटी केंद्र सरकारने महाराष्ट्रासारखं मोठं राज्य अस्थिरतेच्या संकचापासून वाचवलं, असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली कोरोनाशी लढत आहे. अशा वेळी कोणतंही राजकारण होऊ नये, राजकीय माध्यमातून कुरघोडी करण्याचा प्रयत्न होऊ नये अशी सगळ्यांची भावना आहे. ही वेळ सरकार आणि विरोधी पक्ष यांनी हातात हात घालून महाराष्ट्राची सेवा करण्याची आहे. विरोधी पक्षाकडेही आशेने डोळे लावून बसले आहेत.अशा वेळी संयमाने काम करणे गरजेचे आहे आणि म्हणूनच योगायोग असावा की महाराष्ट्र दिनाच्या मंगलमय दिनी महाराष्ट्राचा अस्थिरता संपवणारा निर्णय निवडणूक आयोगाने दिला, असेही संजय राऊत यांनी म्हटले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

“मोदी फक्त गुजरातचे पंतप्रधान असल्यासारखे का वागतायत?, पृथ्वीराज चव्हाणांचा बोचरा सवाल

News Desk

देशातील ‘या’ राज्याने ३१ ऑगस्टपर्यंत वाढवला लॉकडाऊन    

News Desk

नागपूरमध्ये आता ३१ मार्चपर्यंत कडक निर्बंध, पालकमंत्र्यांची महत्वाची घोषणा

News Desk