HW News Marathi
देश / विदेश

“असे येडे बरळतच असतात”, राऊतांचा कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना सणसणीत टोला  

मुंबई | महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा पेटला आहे. कर्नाटकने उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी असं म्हटलं होतं की मुंबईही कर्नाटकचा भाग आहे यावरुव शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सवदी यांना सुनावले आहे. असे येडे बरळत असतात. त्यांनी जरा महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या प्रश्नाचा अभ्यास करावा, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.बेळगाव सोडा, मुंबईही कर्नाटकचा भाग आहे, असं कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी म्हणाले होते. त्यावर संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सवदी यांच्यावर टीका केली.

“असे येडे बरळतच असतात, काल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जे सागंतिलं तेच योग्य आहे. हा केवळ कर्नाटकचा प्रश्न नाही. तर दोन राज्यांच्या सीमांचा प्रश्न आहे. त्यामुळे कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी थोडा इतिहास समजून घेतला पाहिजे. मुंबईतील कानडींवर आम्ही कोणतीही सक्ती केली नाही. त्यांना पूर्ण स्वातंत्र्य दिलं आहे. त्यांच्या शाळाही इथे आम्ही चालवतो. त्यांच्या संस्थाही महाराष्ट्रात चालतता. तशी परिस्थिती बेळगावमध्ये आहे का? बेळगावमध्ये मराठीचं काय स्थान आहे? असे सवाल करतानाच कानडी लोकांना आम्ही महाराष्ट्राच्या बाहेर जायला सांगत नाही. आम्ही फक्त कर्नाटक व्याप्त भाग महाराष्ट्रात यावा असं सांगत आहोत. कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी एकदा महाराष्ट्रात यावं आणि इथल्या कानडी लोकांशी बोलावं”, असंही राऊत म्हणाले.

उद्धव ठाकरे राज्याच्या हिताचा अजेंडा राबवत आहेत

शिवसेना आपला अजेंडा राबवत असल्याची टीका होत आहे. शिवसेनेने आपला अजेंडा राबवला तर चुकलं कुठं? देशात सहा सात वर्षांपासून ज्यांची सत्ता आहे ते कुणाचा अजेंडा राबवत आहेत? कशा प्रकारे अजेंडा राबवत आहेत? नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या विकास कामांचं श्रेय कोण घेत आहे? आम्ही काय अजेंडा राबवावा हे आम्हाला कोणी सांगू नये, उद्धव ठाकरे हे महाराष्ट्र हिताचाच अजेंडा राबवत आहेत, असं राऊत म्हणाले. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी जसे देशाचे होते, तसेच बाळासाहेब ठाकरे सुद्धा देशाचे होते. एखाद्या प्रकल्पाला त्यांचं नाव दिलं म्हणजे शिवसेनेने आपला अजेंडा राबवला असं होत नाही, असंही ते म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान मोदी आणि नथुराम गोडसे यांची विचारसरणी एकसारखीच !

swarit

संसद भवनाची मालकी तरी भविष्यात स्वतंत्र हिंदुस्थानच्या लोकांकडे राहू द्या, सेनेचा केंद्राला टोला

News Desk

“निवडणुकीच्या प्रक्रियेने निवडणूक आयुक्त नेमले गेले पाहिजे”, उद्धव ठाकरेंनी केली मागणी

Aprna