HW News Marathi
महाराष्ट्र

लातूर ग्रामीण मतदारसंघ धीरज देशमुख यांच्यासाठी फिक्स केला, संभाजी निलंगेकरांचा खळबळजनक दावा

लातूर | लातूरचे भाजपचे दिग्गज नेते संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी राज्यात विधानसभेला प्रचंड मोठ्या फिक्सिंगचा गौप्यस्फोट केला आहे. या फिक्सिंगमध्ये फक्त शिवसेना, काँग्रेसचे नेतेच नाही तर खुद्द भाजपचेही नेते होते, असंही त्यांनी सुचित केलंय. म्हणजेच फडणवीस, ठाकरे, देशमुख यांनी एकत्रित येऊन राजकीय फिक्सिंग केल्याचं त्यांनी उघडपणे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत लातूर ग्रामीण हा मतदारसंघ धीरज देशमुख यांच्यासाठी काँग्रेस ने शिवसेनेसोबत मुंबई मधील एका जागेच्या बदल्यात फिक्स केला होता असा खळबळजनक आरोप भाजपचे माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केला आहे. तसेच लातूर ग्रामीण हा पारंपरिक भाजपचा मतदारसंघ असताना देखील सेनेने सोडवून घेतला आणि कोणालाही माहिती नसलेला उमेदवार दिला. जिथे रमेश कराड २०१४च्या निवडणुकीत ९७ हजार मते त्यांनाही डावलले असाही आरोप त्यांनी केला आहे.

२०१४ मध्ये रमेश कराड हे लातूर ग्रामीण मतदारसंघातून भाजप उमेदवार होते. त्यांना 93 हजार मतं मिळाली होती. अवघ्या सात ते आठ हजार मतांनी त्यांची जागा गेली. २०१९च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सेना-भाजपची युती होती. कराड यांची उमेदवारी ग्राह्य धरली जात असताना शिवसेनेने या जागेसाठी टोकाचा आग्रह धरला. अखेर युती टिकवण्यासाठी रमेश कराड यांना भाजप सोडून शिवसेनेकडून लढवण्याचा निर्णय झाला. त्यांना आम्ही शिवबंधन बांधण्यास सांगितलं, कराड पक्षप्रवेश करणार त्याचवेळी सचिन देशमुख यांना शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर झाली, असा दावा संभाजी पाटील निलंगेकर यांनी केला आहे.

सर्व स्थानिक स्वराज्य संस्था काँग्रेसच्या विरोधात आहेत. जिल्हा परिषदा, पंचायत समिती, नगर पंचायती भाजपकडे आहेत. मग शिवसेनेने त्याच जागेचा आग्रह का केला, असा सवाल संभाजी पाटील निलंगेकरांनी उपस्थित केला. हा मुद्दा वर येण्याचं कारण म्हणजे साडेतीनशे शिवसैनिकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आम्ही ज्या पक्षासाठी जीवापाड काम केलं, त्यांनी दगा केला. न लढता फिक्सिंग करणं हा लोकशाहीचा खून आहे. तुम्ही एकदा जिंकाल, पण हे सतत होणार नाही, जनता याचं उत्तर देईल, असा इशाराही संभाजी पाटील निलंगेकरांनी दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाणांची केंद्राकडे महत्वाची मागणी!

News Desk

#Coronavirus : नंदुरबारमध्ये कोरोनाचा आढळला पहिला कोरोना पॉझिटिव्ह

News Desk

गणेशोत्सवापूर्वी कोकणातून जाणाऱ्या रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे पूर्ण करा! – रवींद्र चव्हाण

News Desk