HW News Marathi
देश / विदेश

पंतप्रधान खूप दिलदार, गुजरातला १००० कोटी दिले महाराष्ट्राला १५०० कोटी देतील!

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तौत्के चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी गुजरातला १ हजार कोटींची मदत दिली आहे. २ दिवसांपूर्वी त्यांनी गुजरात दौरा करत चक्रीवादळामुळे किती नुकसान झाले याची पाहणी केली. त्यांनतर ही मदत निधी जाहीर केली. यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदींना टोला लगावला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तौत्के चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी गुजरातला १ हजार कोटींची मदत देऊ केली. महाराष्ट्र आणि गोव्यातही वादळामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राला १५०० कोटींची मदत दिली पाहिजे, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे.

“पंतप्रधान मोदींचे संपूर्ण देशात लक्ष असते. त्यामुळे ते महाराष्ट्राला तौत्के चक्रीवादळातील नुकसान भरपाईसाठी १५०० कोटींची मदत देतील. ते खूप दिलदार आहेत”, असं संजय राऊत म्हणाले आहेत. “पंतप्रधानांनी गुजरातला तात्काळ मदत केली. त्याविषयी आम्हाला दु:ख असण्याचे कारण नाही. मात्र, कधीतरी पंतप्रधान मोदींचे विमान महाराष्ट्राकडेही वळेल अशी आशा मी करतो”, असा खोचक टोलाही राऊत यांनी लगावला. महाराष्ट्र आणि गोव्याला केंद्र सरकारने अनुक्रमे १५०० आणि ५०० कोटींची मदत द्यावी, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

“स्फोटक प्रकरणात अंबानींची तक्रार कुठे ?”, वकील असीम सरोदेंचा सवाल

News Desk

महिला सुरक्षेसाठी सरकारने कठोर कारवाई आणि कायदे करण्याची गरज !

swarit

मोदींनीही आक्रमक होऊन चीनला धडा शिकवला पाहिजे !

News Desk