HW News Marathi
महाराष्ट्र

आमचं हिंदुत्व प्रमाणित करण्यासाठी इतर कोणत्या पक्षाची गरज नाही, राऊतांचे राणेंना प्रत्युत्तर

मुंबई | आज हिंदुह्रदयम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतीदिन. त्यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आदरांजली वाहिली. त्यानंतर प्रसार माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. आमचं हिंदुत्व प्रमाणित करण्यासाठी, स्प्ष्ट करण्यासाठी इतर कोणत्या पक्षाची गरज नाही. आम्ही प्रखर हिंदुत्ववादी होतो, आहोत आणि राहू असं सांगत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

हिंदुत्वावरुन भाजप शिवसेनेवर करत असलेल्या टीकेसंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “आमचं हिंदुत्व प्रमाणित करण्यासाठी, स्प्ष्ट करण्यासाठी इतर कोणत्या पक्षाची गरज नाही. आम्ही प्रखर हिंदुत्ववादी होतो, आहोत आणि राहू, आम्हाला तुमच्याकडून प्रमाणपत्राची गरज नाही. आम्ही कधीच हिंदुत्वाचं राजकारण करत नाही. देशात जिथे कुठे गरज पडेल तेव्हा शिवसेना हिंदुत्वाची तलवार घेऊन हजर राहील”. भाजप नेते निलेश राणे यांनी महाविकास आघाडी सरकार आणि हिंदुत्व यांचा काहीही संबंध शिल्लक राहीला नाही अशी टीका केली होती. त्या टीकेला संजय राऊत यांनी प्रत्यत्तर दिले आहे.

“गेल्या वर्षी याच काळात सरकार बनवण्याची प्रक्रिया सुरु होती. लोकांच्या मनात शंका होत्या. पण आज बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळार शिवसेनेचा मुख्यमंत्री तेसुद्दा उद्धव ठाकरे यांच्या रुपाने मानवंदना देण्यासाठी आले आहेत. बाळासाहेब आमच्यात नाहीत ही वेदना कायम राहील. पण बाळासाहेब आमच्यासोबत आहेत आणि सतत राहतील, प्रेरणा देतील असा विश्वास आहे,” असं यावेळी त्यांनी सांगितलं.“आजच्या दिवशी शिवसेनाप्रमुखांना आम्ही फक्त देहाने निरोप दिला पण त्यांचे विचार, हिंदुत्व, मराठी बाणा हे सगळं आमच्यासोबत कायमस्वरुपी आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात हा वारसा पुढे नेऊ,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

“आजही देशाचं राजकारण ५५ वर्षांपूर्वूी बाळासाहेबांनी जो बेरोजगारी, भूमीपुत्रांचा मुद्दा मांडला त्यावरच केंद्रीत आहे. बिहार निवडणुकीत पाहिलं असेल तर या दोन मुद्द्यांवर विषय केंद्रीत राहिला. महाराष्ट्रात बाळासाहेबांनी ५५ वर्षांपूर्वी ठिणगी टाकली होती. प्रत्येक राज्यात भूमीपूत्रांचा विषय राजकारणातला आणि समाजकारणातला महत्वाचा विषय ठरतोय,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

येत्या काळात महाराष्ट्र राज्य कबड्डीत देशात अव्वल असेल: होनप्पा गौडा

News Desk

“शिवसेनेची परंपरागत सत्ता काढून घेण्यासाठी जे येतील त्यांना सोबत घेऊ”, प्रसाद लाड यांचे सुचक वक्तव्य

News Desk

अमेरिकेत सत्तांतर झालेच आहे, बिहार सत्तांतराच्या शेवटच्या पायरीवर, सामनातून भाजपवर टीका

News Desk