HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यपालांना भेटणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे – संजय राऊत

पुणे | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज (३१ ऑक्टोबर) पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी २९ ऑक्टोबरला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनावर जाऊन भेट घेतली होती. यावरुन संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यपालांना भेटणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री आणि सरकार हे लोकनियुक्त आहे. तुम्ही सगळ्या प्रश्नांसाठी आधी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटले पाहिजे. त्या खात्यातील मंत्र्यांना भेटले पाहिजे, असे राऊत यांनी म्हटले आहे.

राज ठाकरे यांनी राज्यपालांची भेट वाढीव वीज बिलासंदर्भात घेतली होती. वाढीव वीज बिलासंदर्भात सरकारने तातड़ीने निर्णय घेत जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी राज ठाकरेंनी राज्यपालांना भेटत केली होती. मात्र, राज ठाकरे यांच्या राज्यपालांच्या भेटीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खडे बोल सुनावले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

“शिवसेनेला टार्गेट केलं जातंय”, भावना गवळींचा आरोप

News Desk

पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची बदली तर चित्रा वाघ यांची राज्य सरकारवर टीका!

News Desk

“केंद्रावर दुगाण्या झाडण्यापेक्षा आधी आपल्या अधिकाऱ्यांना झोपेतून जागे करा”, भाजपचा राष्ट्रवादीला पलटवार

News Desk