HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यातील सरकारमधून बाहेर पडावे अशी इच्छा राहुल गांधी यांची नाही, संजय राऊतांचा वडेट्टीवारांना टोला

मुंबई | ‘काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासोबत आमचा संवाद चांगला आहे. राज्यातील सरकारमधून बाहेर पडावे अशी इच्छा राहुल गांधी यांची नाही, आमचा त्यांच्याशी योग्य संवाद सुरू आहे’ असे शिवसेना खासदार राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. तसेच, ‘महाराष्ट्रामध्ये सरकार कसे सुरू आहे, हे दिल्लीतील नेत्यांना चांगलेच माहित आहे. त्यामुळे हे सरकार पडेल असे वाटत नाही’ असेही राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

‘राहुल गांधी यांच्या इच्छेनुसारच महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीमध्ये सहभागी झाला होता. जर राहुल गांधी हे जर महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यास उत्सुक नसते तर सरकार स्थापन झाले नसते. त्यांच्या सहमतीनेच सरकार स्थापन झाले आहे. उद्या जर राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष झाले आणि त्यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचे सांगितले तर आम्हाला एक मिनिटही लागणार नाही’, असे वडेट्टीवार म्हणाले होते. त्यांच्या या म्हणण्यावर संजय राऊत यांनी पलटवार केला आहे.

तसेच, अध्यक्षपद हे कुणाला द्यावे हा काँग्रेसचा पक्षांतर्गत विषय आहे. केंद्रात काँग्रेस हा विरोधी पक्ष आहे. मात्र, त्यांची ताकद कमी झाली आहे हे सत्य आहे. काँग्रेस पक्षाने अंतर्गत मतभेद संपून मजबूत होणे अपेक्षित आहे. काँग्रेसला उभारी येणार गरजेचे आहे’ असेही राऊत म्हणाले. ‘गांधी घराणं हेच त्यांचं आधार कार्ड आहे. गांधी घराण्यापलीकडे कोणी नेतृत्व करावं हे संयुक्तिक नाही. काँग्रेसचे नेतृत्व करण्याइतकी क्षमता राहुल गांधी यांच्यामध्ये आहे’ असेही राऊत यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आशिष देशमुख यांच्या हाती आता काँग्रसेचा झेंडा

swarit

अजितदादांनी पालकत्व स्वीकारलेल्या कारखान्याची अवस्था वाईट! भालकेंच्या राजीनाम्याची मागणी!

News Desk

पैसे वाटपाच्या संशयावरून भाजपच्या कार्यकर्त्याला मारहाण

News Desk