HW News Marathi
महाराष्ट्र

“सरकारविरोधात बोलणाऱ्यांच्या कुंडल्या घेऊन बसलो आहे”, फडणवीसांचे हे वक्तव्य म्हणजे काय? राऊतांचा सवाल

मुंबई | आज विरोधी पक्षनेते असलेले देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका करत गंभीर आरोप केला आहे. धमक्या देणारा मुख्यमंत्री पाहिला नाही असे त्यांनी म्हटले आहे. यावरून आघाडी सरकार आक्रमक झाले आहेत. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांना सुनावले आहे.

“मला वाटत नाही की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असं कुठेही बोलले. मात्र फडणवीसांना जर ही धमकीची भाषा वाटत असेल तर देवेंद्र फडणवीस हे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा सरकारविरोधात बोलणाऱ्यांच्या कुंडल्या घेऊन बसलो आहे असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. ही भाषा तर भयंकर धमकीची होती. त्यांची अशी अनेक वाक्य आहेत जी धमकी वाटू शकतात असंही संजय राऊत म्हणाले. म्हणजे सत्तेचा वापर करुन तुम्ही धमकी देऊ पाहत होतात का? असाही प्रश्न संजय राऊत यांनी विचारला आहे. तसंच उद्धव ठाकरे हे फक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाहीत तर शिवसेना पक्ष प्रमुख आहेत हे कुणी विसरु नये”, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?

“महाविकास आघाडी सरकारला 1१ वर्ष पूर्ण झालं. मात्र अचिव्हमेंट काय आहे? मुख्यमंत्र्यांनी सामनाला मुलाखत दिली, पण त्यामध्ये वर्षपूर्तीचा आढावा हवा होता, प्रश्न कसे सोडवणार, याबद्दलचं व्हिजन आवश्यक होतं, मात्र ते दिसलंच नाही. मुलाखतीत फक्त धमक्या दिसल्या. मुख्यमंत्री संयमी आहेत हे ऐकून होतो पण दसरा मेळाव्याचं भाषण असो की कालची मुलाखत यातून ते संयमी नसल्याचं दिसून आलं”, अशी टीका फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर केली.

“हात धुवून मागे लागू, खिचडी शिजवू, ही कोणती भाषा? तुम्ही संविधानिक पदावर आहे. अशा प्रकारची भाषा मुख्यमंत्र्यांना शोभत नाही. या मुलाखतीत विकासावर अजिबात चर्चा नाही. चर्चा कशावर तर कुणाच्या मागे हात धुवून लागू आणि कुणाची खिचडी शिजवू यावर मुलाखतीचा भर होता. ही मुलाखत मुख्यमंत्रिपदाला शोभणारी नव्हती”, असं फडणवीस म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

६.८ टक्के विकासदराने १ ट्रिलीयन डॉलरची अर्थव्यवस्था हे दिवास्वप्नच! – नाना पटोले

Aprna

बीड नगर परिषदेत राष्ट्रवादी शिवसेना वाद पेटला!

News Desk

मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर प्लास्टिकचा थर असलेल्या उत्पादनांवर राज्यात बंदी

Manasi Devkar