HW News Marathi
Covid-19

HW Exclusive : हिवरेबाजार गावात कोरोनाचा शिरकाव नाही, सरपंचांनी सांगितले ‘हे’ कारण

मुंबई | राज्यात कोरोना रुग्णांची संख्या ही वेगाने वाढत आहे. पण, राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातील हिवरेबाजार गावात कोरोनाचा एकही रुग्ण अद्याप नाही. यामागचे कारण म्हणजे हिवरेबाजर गावातील आदर्शग्राम समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनामुळे शक्य झाले आहे. या पार्श्वभूमीवर एच. डब्ल्यू. मराठीने हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार यांची खास मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीतून हिवरेबाजर गावात कोरोनापासून संरक्षणासाठी कोणकोणत्या उपायोजना केल्या यांची संपूर्णा माहिती एच. डब्ल्यू. मराठीला दिलेल्या मुलाखती सांगितली आहे.

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिला २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली. तेव्हा आमच्या हिवरेबाजार गावात आम्ही आमची आचारसंहिता तयार केली. त्यानुसार, आम्ही शहरात असलेल्या लोकांशी संपर्क सांधून त्यांच्या सुरक्षेची माहिती घेतली आणि जर शहरात सुरक्षित नसला तर गावी येण्याचे आवाहन पोपटराव पवार यांनी शहरातील लोकांना केल्याचे एच. डब्ल्यू. मराठीच्या मुलाखतीत सांगितले. गावात ज्यात ठिकाणी गर्दी म्हणजे, रेशन दुकान, दुधाची डेरी या ठिकणची व्यवस्थापना आम्ही सर्वप्रथम केले. यानंतर शेता शेतमाल जो आण्याचा आहे आणि जो विक्रीसाठी बाहेर नेहायचा आहे. या सर्व गोष्टीचे आम्ही नियोजन केले. जेव्हा शहरातून गावाकडे लोक आली. तेव्हा आम्ही त्यांना होम क्वारंटाइन अथवा संस्थात्मक क्वारंटाइन केले, अशी माहिती पोपटराव पवार यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना सांगितले.

स्वच्छा राहा खा ही गेल्या ३० वर्षापासून गावाची परंपरा आहे. यामुळे आम्हाला कोणाला सांगण्याची गरज पडली नाही. तसेच गेल्या दोन महिन्यामध्ये आमच्या गावात एक ते दीड कोटी रुपयाची कामे केली. म्हणजे जे डोंगर पडलेले होते. यासाठी जे. सी.बी, डंबर, ट्रक्टर यांच्यासह्याने ते काम पूर्ण केले. शेत बांधावरच्या काही समस्या ज्या ३० ते ४० वर्षापासून सुटल्या नव्हते, ते सर्व वाद मिटविले. एका बाजुला देशात संकट आहे, तर दुसऱ्या बाजुला देशात जमिन सपाटीकरण करणाची कामे आणि शेतविषय इतर कामे केली. तसेच गावकरांनी स्वयंशिस्त पालन केल्यामुळे पोलीस यंत्रणेची गरज पडली नाही, असेही पोटराव पवार यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलतांना सांगतिले.

अवघ्या तीन दिवसात गावातील लोकांच्या तपासणी केली

नुकतेच देशातील पाचव्या लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर आम्ही शहरातील रेड झोनमध्ये आलेल्या लोकांना गावी आली. तेव्हा त्या लोकांना संस्थात्मक क्वारंटाइन करण्याचा निर्णय आम्ही घेतला. आरोग्य उपकेंद्र, अंगणवाडी सेविका, आशाताई सेविका आणि डक्टरांच्या मदतीने गावातील प्रत्येक घरातील लोकांची तपासणी केली. अवघ्या तीन दिवसात गावतील लोकांची तपासणी केली आणि ९८ टक्के तापमाण कोणाचे नसल्याने कोरोनाची चाचणी करण्याची आम्हाल गरज बासली नाही. गावात कोरोनाचा शिरकाव झालेला नाही. यामुळे गावकरी आनंदी झाले, असेही पोपटराव पवार यांनी एच. डब्ल्यू. मराठीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले. गावातील लोकांना कोरोनामुळे बरे झालेल्या लोकांची माहिती झाली. सोशल मिडियाचा योग्य पद्धतीने वापर करत लोकांच्या मनातील कोरोनासंदर्भात असलेली भीत कमी करण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले.

कोणत्याही निर्णयाचा आनंद वाटला पाहिजे भिती नाही

राज्यातील प्रत्येक गावावातील नेतृत्व करणारी लोकांनी जर योग्य पद्धतीने निर्णय घेतले. तर नक्की गावातील लोक देखली त्यांना सात देतात. बाहेरून आलेल्या लोकांना ज्या ठिकाणी संस्थात्मक क्वारंटाइन करतोय, त्या ठिकाणी योग्य आवश्यक दिली. त्यामुळे संस्थात्मक लोकांना क्वारंटाइन केल्यामुळे त्यांना कुठेही भिती वाटली नाही, असेही पोपटराव पवार यांनी एच डब्ल्यू. मराठीशी बोलताना सांगितले. लोकांना कोणत्याही निर्णयाचा आनंद वाटला पाहिजे भिती नाही, असेही पोपटराव पवार यांनी यांनी सांगितले.

हे मानव जातीवरील संकट आहे. हे गावापासून तर दिलेपर्यंत लोकांनी एकत्र येऊन हे संकट दूर केले पाहिजे. देशात पंतप्रधान आणि मुख्यमत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाचे आपण कोणतेही गटतट असता कामा नये, असा संदेशही त्यांनी पोपटराव पवार यांनी एच. डब्ल्यू.मराठीशी बोलतांना सांगितले. गावे सुरक्षित ठेवायची असेल तर आपल्याला गावांमध्ये सकारत्मता निर्माण करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.

संपूर्ण मुलाखत

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशात एकाच दिवसात ४ लाखांहून अधिक नवे कोरोनाबाधित, तर ४ हजारांहून अधिक मृत्यू

News Desk

भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कोरोनाची लागण

News Desk

‘राजीव गांधी फाऊंडेशन’ भाजपचा काँग्रेसला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न, विचारले ‘हे’ १० प्रश्न

News Desk