HW News Marathi
महाराष्ट्र

“सत्ता गेल्यावर सगळेच जमिनीवर येतात”, सत्यजित तांबेंचा फडणवीसांवर निशाणा

मुंबई | संपूर्ण राज्यभरात मुसळधार पावसाने अनेक भागांना अक्षरश: झोडपून काढले आहे. पिकांचेही अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी चिंतेत पडला असून यावरुन राज्यात राजकारणालाही सुरुवात झाली आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून राज्य सरकारला यावरुन टार्गेट करुन जोरदार टीका करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर युवा काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

नेत्यांचे काही फोटो शेअर करत त्यांनी “सत्ता गेल्यावर सगळेच जमिनीवर येतात” अशा आशयाचे ट्विट करीत फडणीवसांना चिमटा काढला आहे. सत्यजित तांबे यांनी सुरुवातीला ट्विट करताना म्हटलं की, “माणूस सत्तेवर असतांना जमिनीवर पाहिजे. सत्ता गेल्यावर तर सगळेच जमिनीवर येतात.” दुसऱ्या एका ट्विटमध्ये त्यांनी फडणवीस सरकारमधील नेत्यांचे विमानातून पूरस्थितीची पाहाणी करतानाचे फोटो तसेच ठाकरे सरकारमधील नेत्यांचे प्रत्यक्ष जमिनीवरुन पूरस्थितीची पहाणी करतानाचे फोट पोस्ट केले आहेत. तसेच या फोटोंना त्यांनी ”फरक, जमिनीचा व हवेचा!” असे त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“… तर तुझ्या डोक्यात ६ गोळ्या घालेन”, धनंजय मुंडे प्रकरणाने राजकारण पेटलं 

News Desk

सरकार जरी तीन पक्षाचे असले तरी ड्रायव्हिंग सीटवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच आहेत – अशोक चव्हाण

News Desk

जो भाऊ अन् कमला अक्का! अमेरिकेच्या नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्षांना पुणेरी शैलीत शुभेच्छा

swarit