HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबईत शाळा सुरु, एका बेंचवर एक विद्यार्थी, पालकांची संमती आवश्यक!

मुंबई। महाराष्ट्राच्या ग्रामीण भागासह मुंबईतल्या शाळांची घंटा आजपासून म्हणजेच 4 ऑक्टोबर पासून सुरु होणार आहेत. आठवी ते बारावीचे वर्ग आजपासून सुरु होतील. महाराष्ट्र सरकारनं दिलेल्या नियमांचं काटेकोर पालन करुन मुंबईतल्या शाळा सुरु होणार आहेत. राज्य सरकारनं याअगोदर ग्रामीण भागातील शाळा सुरु करण्यासंदर्भात निर्णय घेतला होता. आता मुंबईतल्या शाळा सुरु करण्याच्या प्रस्तावाला मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. एका बाकावर एक विद्यार्थी, एक दिवसाआड उपस्थिती यासह इतर नियमांचं पालन करुन मुंबईतल्या शाळा आजपासून सुरु होणार आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांकडे सर्व अधिकार देण्यात आले

मुंबईबरोबरच राज्यात 4 ऑक्टोबर पासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामीण भागातील 5 ते 12 वी आणि शहरी भागात 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु होणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी शाळा सुरु करण्यास मंजुरी दिली आहे. शाळा सुरु करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे सर्व अधिकार देण्यात आले आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचं पालन करुन शाळा सुरु ठेवण्यात येणार आहेत. शाळा सुरु करण्यासंदर्भात टास्क फोर्सकडून सूचना मिळाल्या आहेत.

राज्यात 4 ऑक्टोबरपासून शाळा सुरु होत आहेत पण विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांची मंजुरी आवश्यक असेल, असं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलंय. ज्या विद्यार्थ्यांचे पालक मंजुरी देणार नाहीत त्यांना उपस्थित राहण्यासाठी सक्ती करु नये, अशा सूचनाही वर्षा गायकवाड यांनी दिल्या आहेत.-

विद्यार्थ्यांसाठी सूचना

एका बेंचवर एक विद्यार्थी

शाळा प्रवेशासाठी पालकांची मंजुरी आवश्यक

सर्व विद्यार्थी शाळेत येणार असतील

तर एक दिवस आड शाळा

एका दिवशी १५ ते २० विद्यार्थ्यांनाच प्रवेश

सोशल डिस्टन्सिंग पाळणं आवश्यक

मास्क परिधान करणे आवश्यक

सॅनिटायजर वापरणं गरजेचं

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांनी रेमडेसिव्हीरचा साठा बाहेर विकला, भाजप खासदाराचा आरोप

News Desk

पदवीधर निवडणूकीत राष्ट्रवादीला बंडखोरीचं ग्रहण

News Desk

राज्यातील जनतेला देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री म्हणून हवे होते – जे.पी.नड्डा

News Desk