HW News Marathi
महाराष्ट्र

‘कायमस्वरुपी तोडगा काढावा लागेल,कटू निर्णय घ्यावे लागतील, मुख्यमंत्र्यांचा भिलवडी वाशियांना दिलासा

सांगली | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज(२ ऑगस्ट) सांगली दौऱ्यावर आहेत. सांगली जिल्ह्यात अतिवृष्टी आणि महापुरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे याची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे तिथे गेले आहेत. सकाळी अकरा वाजल्यापासून उद्धव ठाकरे अंकलखोप, भिलवडी, मौजे डिग्रज, कसबे डिग्रज आणि सांगली येथे पूर परिस्थितीची पाहणी करत आहेत. तसेच पूरग्रस्तांच्या भेटीगाठी घेऊन दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात पूर परिस्थिती बाबत आढावा बैठक घेणार आहेत.

मी प्रामाणिकपणे मदत करणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज(२ ऑगस्ट) सांगली दौऱ्यावर आहेत. तिथे पाहणी केल्यावर त्यांनी तिथल्या नागरिकांशी संवाद साधला. तेव्हा ते म्हणाले, यातून मार्ग काढणारच, किती नागरिकांना मदत करावी लागेल याची माहिती घेत आहो, आपल्याला कायमस्वरुपी तोडगा काढावा लागेल, काही ठिकाणी कटू निर्णय घ्यावे लागतील, कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, हे माझं वचन आहे, पण कटू निर्णयालाही साथ द्यावी लागेल अन्यथा २००५, २०१९ आणि २०२१ अशी पुरांची मालिका सुरु राहायची, दरवर्षी नुकसान आणि मदत हे चक्र भेदावं लागेल. कायमस्वरुपी तोडगा काढावा लागेल.

संकट आल्यानंतर पॅकेज जाहीर करतात, पण ते पॅकेज जातं कुठं माहिती नाही. मी प्रामाणिकपणे मदत करणार आहे. हे सरकार तुमचं आहे. तुम्ही अजिबात काळजी करु नका. सगळ्या प्रशासनाकडून आढावा आला आहे., जे जे करणे सत्य आहे, ते ते केल्याशिवाय राहणार नाही.

कसा असेल मुख्यमंत्र्यांचा दौरा?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज(२ ऑगस्ट) सांगली दौऱ्यावर आहेत. तिथल्या पूरपरिस्थितीचा ते आढावा घेणार आहेत. सकाळी सव्वा दहा वाजता पलूस येथे कृष्णा वेरळा मागासवर्गीय सहकारी सूत गिरणीच्या हेलिपॅडवर त्यांचे आगमन होईल. सांगलीच्या पलुस तालुक्यातील भिलवडी भागातून उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याला सुरुवात होईल. पुरामुळे बाधित भागाची पाहणी करुन मुख्यमंत्री पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर पलुस तालुक्यातील अंकलखोप येथे पुरामुळे बाधित झालेल्या भागाची ते पाहणी करतील. त्यानंतर मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज, मौजे डिग्रज या भागात जाऊन पूरग्रस्त भागाची पाहणी मुख्यमंत्री करतील.

ग्रामीण भागातील पाहणीनंतर सांगलीच्या आयर्विन पुलाची पाहणी, तसेच हरभट रोड येथे पुरामुळे बाधित भागाची पाहणी उद्धव ठाकरे करणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली येथे जिल्ह्यातील पूर परिस्थितीबाबत आढावा बैठक आणि पत्रकार परिषद असा आज सांगली जिल्ह्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा संपूर्ण दौरा आहे. दोन वाजता कवलापूर येथील विमानतळावरून हेलिकॉप्टरने मुंबईकडे प्रयाण करणार आहेत.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सगळ्यांचा कोथडा काढून शिवाजी महाराजांनी स्वराज्य टिकवलं आणि महाराष्ट्रातही तसंच होईल – संजय राऊत

News Desk

संतोष परब प्राणघातक हल्ला प्रकरण : नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयासमोर शरण

Aprna

रेल्वे अपघात रोखण्यासाठी घेणार जपानची मदत

News Desk