HW News Marathi
महाराष्ट्र

उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या सुरक्षेत वाढ, धमकीचे फोन आल्यामुळे वाढवली सुरक्षा

मुंबई | राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. उदय सामंत यांना धमकीचे फोन येत असल्यामुळे त्यांची सुरक्षा व्यवस्था आता वाय प्लस एस्कॉर्ट दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबत गृहमंत्रालयाने राज्य गुप्तवार्ता विभाग तसेच पोलीस महासंचालकांना पत्राद्वारे माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, शिक्षण मंत्री उदय सामंत यांना गेल्या काही दिवसांपूर्वी विद्यार्थी संघटनेकडून धमकीचा फोन आला होता. उदय सामंत हे गेल्या आठवड्यात अमरावती विद्यापीठ दौऱ्यावर होते. दौरा आटोपून ते नागपूर विद्यापीठाकडे निघणार होते. त्याचवेळी उदय सामंत यांना फोनवरून धमकी देण्यात आली होती. ‘नागपूरला पोहोचू देणार नाही…’, असं या धमकी देणाऱ्यानं म्हटले होते. या आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच गृहमंत्री अनिल देशमुख यांना देखील धमकीचे फोन गेले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मंत्रिपद न मिळालेल्या राष्ट्रवादीच्या नेत्याची नाराजी पुन्हा उघड, जयंत पाटलांच्या दौऱ्यात अनुपस्थिती!

News Desk

साकीनाक्यातील बलात्कार प्रकरणातील महिलेचा मृत्यू!

News Desk

राज्यातील कोरोना स्थितीवर मुख्यमंत्र्यांची सर्वपक्षीय नेत्यांसोबत आज महत्वाची बैठक

News Desk