HW News Marathi
महाराष्ट्र

फडणवीस साहेब जमल तर बघा ! नाही तर सोडून द्या 

उद्धव यांची मुख्यमंत्र्यांवर जोरदार टिका

मुंबई- महाराष्ट्रातील शेतकरी रोज आत्महत्या करतो. आत्महत्येचे प्रमाणही वाढत आहे. त्यांची कुटूंब रस्त्यावर येत आहेत. त्यांना कर्जमाफी द्या हे शिवसेनेने ओरडून सांगितले. याला जर मुख्यमंत्री विकासाला खिळ घालणे म्हणत असतील तर सरकारच्या डोक्यात ‘खिळा’ ठोकावाच लागेल असा टोला उद्धव ठाकरेंनी सामानाच्या आग्रलेखातून मुख्यमंत्र्यांना लगावला आहे. विकासाला खीळ घालण्याइतके ‘बालिश’ राजकारण शिवसेनेने कधीच केले नाही. ज्यांनी ते केले त्यांच्या कर्माची फळे महाराष्ट्राची जनता भोगत आहे. तरीही आम्ही देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देत आहोत ! जमतंय का बघा. नाहीतर सोडून द्या. समझनेवालों को इशारा काफी है! असं उद्धव ठाकरे यांनी सामनातून सांगत पुढील राजकीय उलथापालथीचे जणू संकेतच दिले.

महाराष्ट्रातील फडणवीस सरकारला ३ वर्षे झाली आहेत. हे सरकारने वृत्तपत्रात दिलेल्या लाखो रुपयांच्या जाहिरातींवरून समजले. सरकारला तीन वर्षे झाल्याच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी मोठय़ा मुलाखती दिल्या आहेत. त्यात सरकारी ध्येयधोरणे, भविष्याचा दृष्टिकोन यावर बोलण्यापेक्षा शिवसेनेवर टीका करून व धमक्या देऊन तिसरा वाढदिवस साजरा करायचा असे ‘सरकार’ म्हणविणा-यांनी ठरवलेच असेल तर आम्ही त्यांना त्या कामीही शुभेच्छाच देत आहोत. वाढदिवसाच्या दिवशी तरी शुभ बोलावे असे हिंदुत्वाचे रीतिरिवाज व संस्कृती आहे व संघ परिवारात पालन-पोषण झालेल्यांनी तरी या संस्कृतीचे भान राखायला हवे, पण महाराष्ट्राच्या संस्कृतीवर, अखंडतेवर आणि स्वाभिमानावर तुळशीपत्र ठेवून कुणाला राज्य करायचेच असेल तर तो त्यांचा दोष आहे अशी घणाघाती टिका उद्धव यांनी केली आहे.

उद्धव एेवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी आणखी दोन पाऊले पुढे जात मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. मुख्यमंत्र्यांच्या सर्व मुलाखती म्हणजे ‘विकास गांडो थयो छे ’ची पुढील आवृत्ती दिसत आहे. राज्यातील जनता सुखी नाही, त्यांच्या मनात राज्यकर्त्यांविषयी अस्थिरता व अस्वस्थता आहे. विकासाचे नाव नाही आणि याचे खापर मुख्यमंत्री फक्त शिवसेनेवर फोडत असतील तर विकासच नाही तर राज्यकर्त्यांच्या मानेवरील खोपडीचेही ‘गांडो थयो छे !’ असे म्हणावे लागेल अशा तिखट शब्दांत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना चांगलच सुनावलं आहे. कोडग्या, भ्रष्ट, नालायक लोकांना हाताशी धरून बंद दाराआड व पडद्यामागे शिवसेनाविरोधी कारस्थाने चालणार असतील तर त्या बंद दारास बाहेरून कडीकुलूपे लावून आत कोंडून गुदमरून टाकण्याची हिंमत शिवसेनेत आहे असंही उद्धव यांनी सुनावत शिवसेने विरोधात कटकारस्थाने करण्यात मुख्यमंत्री मग्न असल्याचा आरोपही केला आहे. सिंचन घोटाळ्यातील लोकांना बरोबर घेवून सरकार चालवण्याची तयारी मुख्यमंत्र्यांनी चालवली असल्याचाही आरोप त्यांनी यावेळी केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मी तसं म्हणालो नाहीच!” निधीच्या विधानावरुन अशोक चव्हाणांचा युटर्न

News Desk

झिकाचा रुग्ण आढळल्यानंतर बेलसरमध्ये केंद्रीय पथकाची पाहणी!

News Desk

भाजपच्या मराठी प्रेमाविषयी प्रशनचिन्ह,बेळगांव निवडणुकीवर राऊतांनी खडसावलं !

News Desk