HW News Marathi
महाराष्ट्र

सत्ताधाऱ्यांना राज्यातील पूरस्थितीचे गांभीर्य आहे का ?

कोल्हापूर | गेल्या काही दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्र मुसळधार पावसाने थैमान सुरू आहे. या मुसळधार पावसाचा फटका कोल्हापूर आणि सांगलीला बसला आहे. या महापूरामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. त्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससह अनेक नेत मंडळी यांनी काल (८ ऑगस्ट) कोल्हापूर आणि सांगलीत पूर परिस्थितीचा आढवा घेतला. राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत कोल्हापूरात पूर परिस्थितीचा आढवा घेण्यासाठी गेले असताना सेल्फी व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

महाजनांच्या सेल्फी व्हिडिओमध्ये ते पूर परिस्थितीचा आढवा घेण्यासाठी जात असताना बोटीत बसले असून मोबाईलमध्ये बघत असून हासत हात दाखवित आहेत. या व्हिडिओमध्ये जे दिसते ते पाहता, महाजन पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी गेले होते की पर्यटनासाठी ? असा प्रश्न पडतो. राज्यात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी जात असताना महाजन बोटी बसले असताना, त्यांच्या फोनमध्ये दंग असून कार्यकर्ता सेल्फी व्हिडिओ काढत असताना हासत हात दाखवित आहे. महाजनाच्या या कृत्यावर सर्व स्तरातून टीका होत आहे. यामुळे सत्ताधाऱ्यांना पूर परिस्थितीचा किती गांभीर्य आहे हे यातून दिसून येत आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा समाजाचे मुंबईत ठिय्या आंदोलन

News Desk

राज्यभर तीव्र आंदोलन, मराठा आंदोलकांचा सरकारला इशारा

swarit

जिहादी दहशतवादाशी निघडीत विचारलेल्या प्रश्नामुळे सावित्रिबाई फुले विद्यापीठ अडचणीत

News Desk