HW News Marathi
महाराष्ट्र

पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी तरुण रक्ताला वाव द्यायला पाहिजे

पंढरपुर | पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी तरुण रक्ताला वाव द्यायला पाहिजे. याची सुरुवात मी स्वत:पासून करणार असल्याचे सूचक वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंढरपूरातील एका कार्यक्रमता केले आहे. पुढे पवार असे देखील म्हटले की, विधानपरिषद निवडणुकीत मुख्यमंत्र्यांनी आमच्यापेक्षा जास्त ताकद लावल्यामुळेच त्यांच्या विजय झाला, असल्याची प्रतिक्रिया पवारांनी यावेळी दिली.

तसेच नुकतीच पार पडलेली विधानपरिषदेची निवडणूक पाहता ज्येष्ठ नेत्यांऐवजी तरुण पिढीला संधी देण्याची गरज असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही गरज ओळखून आता पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी तरुण रक्ताला वाव द्यायला पाहिजे. याची सुरुवात मी स्वत:पासून करणार असल्याचे वक्तव्य शरद पवार यांनी केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. पवार त्यांची कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे किंवा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांपैकी नक्की कोणाच्या हाती राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा सोपवतील, याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देवेंद्र फडणवीस म्हणजे बसवलेला मुख्यमंत्री !

News Desk

काळ्यापाण्याची शिक्षा भोगणाऱ्या या सर्वांना भारतरत्न द्यावा लागेल ।सचिन सावंत

swarit

“अपक्ष म्हणून राज्यसभेची निवडणूक लढणार, ” संभाजीराजेंची मोठी घोषणा

Aprna