HW News Marathi
महाराष्ट्र

सचिन वाझे प्रकरणाचा सरकारला कोणताही धोका नाही, गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांचं विधान

मुंबई | “उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाबेर जी स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली होती त्याचा तपास आम्ही एटीएसकडे दिला होता. असं असताना अचानकपणे केंद्रीय यंत्रणेकडे हा तपास देण्यात आला आहे. त्यांना जे योग्य वाटतंय, त्यांना जो काही तपास करायचा आहे तो तपास ते करतील”, अशी प्रतिक्रिया गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी दिली आहे. राज्यात सध्या मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचे प्रकरण गाजत आहे. यावरुन आज सचिन वाझे यांचं निलंबनही करण्यात आले आहे. तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकर यांची भेट शरद पवार यांनी तर घेतली आहेच मात्र, अनेक नेत्यांनी, मंत्र्यांनीही मुख्यमंत्र्यांना भेटण्याचे सत्र सुरुच ठेवले आहे.

एकीकडे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. तर यावर जयंत पाटील यांनी अशी कोणतीही चर्चा नसल्याचं स्पष्ट केलं आहे. यावरुच गृहराज्यमंत्र्यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. “सरकार बिलकूल धोक्यात असण्याचं कारण नाही. विधीमंडळात याबाबत जेव्हा चर्चा झाली तेव्हा अतिशय समर्पक उत्तर गृहमंत्री अनिल देशमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेलं आहे. या प्रकरणावरुन सरकारवर कोणताही धोका होण्याची शक्यता नाही”, असं ते म्हणाले.“एखाद्या प्रकरणात एखाद्या अधिकाऱ्याचं नाव असेल आणि त्या प्रकरणाला तपासाला वेळ लागत असेल तर त्या अधिकाऱ्याला पुन्हा सेवेत रुजू करण्याचं कायद्यात नमूद आहे. नियमबाह्य कोणताही निर्णय घेतलेला नाही”, अशी भूमिका देसाई यांनी मांडली.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यशवंतराव चव्हाण सेंटरला दाखलराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यशवंतराव चव्हाण सेंटरला दाखल झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री हे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी सध्याच्या घडामोडींवर चर्चा करण्याची शक्यता आहे. दरम्यान, शरद पवार यांनी आज दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची देखील भेट घेतली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्य सरकारकडून पूरग्रस्तांची थट्टा, परिपत्रकातील निकषांवर सर्व स्तरांतून टीका

News Desk

मध्य रेल्वेकडून आणखी एक खुशखबर, राज्यात सुरु करणार आणखी ८ ट्रेन

News Desk

सर्वाधिक नुकसानग्रस्त सणसर गावाला खासदार सुप्रियाताई सुळे यांनी दिली भेट ;केली पाहणी

News Desk