HW News Marathi
Covid-19

देशाच्या संरक्षणाच्या मुद्यावरून राजकारण नको, पवारांचा राहुल गांधींना सल्ला

सातारा | गलवान खोऱ्यात १५ जून रोजी रात्री भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये हिंसक झडप झाली. यात भारताचे तब्बल २० जवान शहीद झाले. या घटनेमुळे देशातील वातावरण ढवळून निघाले. याच पार्श्वभूमीवर, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्राला सतत कात्रीत पकडायला सुरुवात केली. दरम्यान, यावरून आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राहुल गांधींना सुनावले आहे. “देशाच्या संरक्षणाच्या मुद्यावरून राजकारण करणे योग्य नाही”, असे म्हणत शरद पवारांनी राहुल गांधींना सुनावले आहे. इतकेच नव्हे तर यावेळी “१९६२ सालच्या युद्धात चीनने भारताचा लखाडमधील बळकावलेला सुमारे ४५ हजार चौकिमीचा भूभाग आपल्याला अद्याप परत मिळवता आलेला नाही”, असे म्हणत शरद पवारांनी राहुल गांधींना इतिहासाची आठवणही करून दिली.

भारत-चीनच्या मुद्द्यावर राहुल गांधींकडून सातत्याने केंद्रावर टीका होत असताना “देशाच्या संरक्षणाच्या मुद्यावरून राजकारण करणे योग्य नाही”, असे म्हणत शरद पवारांनी राहुल गांधींना समज देण्याचा प्रयत्न केला आहे. “सद्यस्थितीत भारत आणि चीनमध्ये तणाव निर्माण झालेला असला तरीही या दोन देशांमध्ये यु्द्ध होण्याची शक्यता मात्र कमी आहे. भारत सरकारकडून सध्या गलवानमधून दौलत बेग ओल्डीकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम सुरू आहे. या रस्त्याचा एक भाग भारताच्या तर दुसरा भाग चीनच्या ताब्यात आहे. चीनचे सैनिक या रस्त्यावर येत असतात.यातूनच गलवानमध्ये भारत-चीन सैनिकांमध्ये झटापट झाली. भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शस्त्रांचा वापर केला जाऊ शकत नाही”, असे शरद पवारांनी यावेळी सांगितले.

जेव्हा २ देशांमध्ये संघर्ष होतो तेव्हा साहजिकच गोळीबारासारख्या घटना घडतात. मात्र, गलवानमध्ये भारत-चीनच्या सैन्यामध्ये गोळीबार झाला नाही. त्यासाठी भारत-चीनमधील करार जाणून घेणे आवश्यक असल्याचेही शरद पवारांनी सांगितले. त्याचप्रमाणे, शरद पवार संरक्षण मंत्री असताना नरसिंहराव यांच्या नेतृत्त्वात चीनमध्ये जाऊन केलेली वाटाघाटी आणि कराराचे महत्त्व देखील यावेळी त्यांनी सांगितले. “चिनी सैन्याला भारताच्या जवानांनी रोखले. त्यांच्यात संघर्ष झाला झाला. संघर्ष झाला याचाच अर्थ आपले जवान जागरूक होते. जर आपले जावं जागरूक नसते तर चिनी सैन्य कधी आले आणि गेले हे कळलेच नसते. त्यामुळे याला संरक्षण मंत्रालयाचे अपयश येणार नाही”, असेही शरद पवार यावेळी म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संक्रमित रुग्णांच्या यादीत भारत दुसऱ्या क्रमाकांवर

News Desk

संजय राऊतांचा नीचपणा उघड ! निलेश राणेंची राऊतांवर आगपाखड

News Desk

लॉकडाऊनमध्ये रोजगार बुडालेल्या इमारत व इतर बांधकाम मजुरांना दोन हजार रुपयांचे वितरण सुरू

News Desk