HW News Marathi
महाराष्ट्र

नाणार प्रकल्पाला गती येणार? शरद पवारांचा ‘या’ मुद्द्यावरुन राज ठाकरेंना फोन…

मुंबई | मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रत्नागिरीतील नाणार प्रकल्पावर रोखठोक भूमिका मांडल्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे शिवसेनेनं सावध भूमिका घेतली आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज ठाकरे यांनी फोन करून त्यांची भूमिका योग्य असल्याचे म्हटले आहे.गेल्या अनेक वर्षांपासून राज्याच्या राजकारणात तापलेल्या नाणार प्रकल्पाच्या मुद्यावर राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले होते.

आज खुद्द शरद पवार यांनी आपल्याला फोन केला होता, अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली आहे. ‘मला शरद पवार यांचा फोन आला होता. त्यांनी माझी नाणार प्रकल्पाबद्दल भूमिका योग्य असल्याचे म्हटलंय. आता पवार साहेब मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे’, असं राज ठाकरे यांनी सांगितले आहे. ‘मी नाणार प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलेन’, असे शरद पवार यांनी सांगितल्याचा खुलासा राज ठाकरे यांनी केला आहे. त्यामुळे आता नाणार प्रकल्पाविषयीच्या घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे.

राज्य सरकारने बासनात गुंडाळलेल्या या प्रकल्पाची फाईल पुन्हा उघडणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.तत्पूर्वी नाणार प्रकल्प समर्थकांनी आज (८ मार्च) राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यावेळी प्रकल्पग्रस्तांनी आमचे हे एक काम तेवढे मार्गी लावा. आम्ही तुमचे काय ऋणी राहू, अशी भावना व्यक्त केली.

काय म्हणाले राज ठाकरे पत्रात?’

कोकणावर निसर्गाने सौंदर्याची जितकी मुक्त उधळण केली आहे तितकी इतर ठिकाणी फारशी आढळत नाही ह्या विषयी कोणाचंच दुमत असू शकत नाही. प्रत्येक पर्यटन स्थळ हे एखाद्याच विशिष्ट ऋतूत खुलून दिसतं आणि इतर वेळेस ते तितकं मनाला भावत नाही. पण कोकणच्या बाबतीत मात्र निसर्गाने कमाल केली आहे. तिन्ही ऋतूत कोकण सुंदर दिसू शकतं आणि म्हणूनच पर्यटन हा कोकणाचा आणि पर्यायाने माझ्या कोकणी माणसाच्या जगण्याचा श्वास होऊ शकतो. कोकणचं कॅलिफोर्निया होणार असं जेंव्हा जेंव्हा मी ऐकतो तेंव्हा मला त्याचा अर्थ कळत नाही. कारण खरं तर कोकणाला विकासाच्या कुठल्याच मॉडेलची गरज नाही उलट तेच जगातील विकासाचं एक उत्कृष्ट मॉडेल बनू शकतं. अर्थात ह्या दृष्टीने एक समग्र विचार कधीच झाला नाही जो आता व्हायला हवा असं मला वाटतं’

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी मतदान सुरु 

News Desk

सलग तीन वर्षे सुट्टीत वृक्ष संवर्धन

News Desk

महाराष्ट्रात हे चालले तरी काय?…. देवेंद्र फडणवीस यांचा महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल!

News Desk