HW News Marathi
देश / विदेश

दिल्लीत बसून शेती करता येत नाही, शरद पवारांनी मोदींना फटकारलं 

मुंबई | जवळपास १ महिना शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. यावरुन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी मोदी सरकारला फटकालं आहे. राज्य सरकारांना कोणत्याही प्रकारे विश्वासात न घेता, त्यांच्याशी सल्लामसलत न करता केंद्राने तीनही कृषी कायदे शेतकऱ्यांवर बळजबरीने लादले, असं म्हणत शरद पवार यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. “राज्यांशी कोणतीही चर्चा किंवा त्यांचं मत जाणून न घेताच केंद्र सरकारने कृषी कायदे रेटून नेले. दिल्लीत बसून शेती करता येत नाही”, असा टोला शरद पवार यांनी मोदी सरकारला लगावला होता.

शेतकरीवर्ग देशाच्या कानाकोपऱ्यात पसरला आहे. खेडोपाडी तो काबाडकष्ट करून शेती फुलवतो. अशा स्थितीत दिल्लीत बसून शेतीक्षेत्र चालवता येत नाही, असं शरद पवार यांनी म्हटलंय. यूपीए सरकारच्या कालावधीत कृषिमंत्री असताना मला आणि तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांना शेती क्षेत्रात सुधारणा घडवून आणायच्या होत्या. त्यासाठी आम्ही सगळी तयारीही केली. सर्व राज्यांना विश्वासात घेतलं. त्यांच्याशी वेळोवेळी प्रदीर्घ चर्चा केली, असं पवारांनी सांगितलं आहे.

या आंदोलनाला राजकीय पक्षांची फूस आहे, या पंतप्रधान मोदी यांच्या वक्तव्याचाही पवारांनी यावेळी समाचार घेतला. या मागे कोणत्याही पक्षाचा हात नाही. उलट शेतकऱ्यांनीच राजकीय पक्षांना आंदोलनापासून चार हात लांब ठेवले आहे. अशावेळी या आरोपात तथ्य उरत नसल्याचं पवार म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बलात्कार्यांना २१ दिवसांत फाशी ‘महाराष्ट्रात राबवणार ‘आंध्र पॅटर्न’

News Desk

इराणमध्ये युक्रेनचे विमान कोसळले, १७० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू

News Desk

१८० शेतकरी संघटना आंदोलनाच्या तयारीत

News Desk