HW News Marathi
Covid-19

पडळकरांची टीका अन् फडणवीसांच्या ‘त्या’ दाव्यावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई | भाजपचे नवनिर्वाचित विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी काहीच दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अत्यंत खळबळजनक टीका केली होती. पडळकरांच्या या टीकेनंतर राज्यातील राजकारण देखील चांगलेच पेटले होते. दरम्यान, त्यानंतर आता स्वतः शरद पवारांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. “गोपीचंद पडळकरांना काहीही महत्त्व देण्याची मला गरज वाटत नाही. अनेकवेळा त्यांचे डिपॉझिट जप्त केले आहे. आता अजून कशाला बोलायचे ?, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे, पवारांनी यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही टोला लगावला आहे.

राज्यातील कोरोनास्थितीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार हे आज (२७ जून) साताऱ्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवारांनी “देवेंद्र फडणवीस हे सध्या काहीही बोलून प्रसिद्ध मिळवत आहेत”, असे म्हणत ‘द इनसायडर’साठी लेखक, मुलाखतकार राजू परुळेकर यांनी घेतलेल्या देवेंद्र फडणवीसांच्या एक मुलाखतीतील दाव्याचा देखील समाचार घेतला आहे. गेल्या २ दिवसांत राष्ट्रवादीशी संबंधित गाजलेल्या या २ महत्त्वपूर्ण विधानांच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांकडून अखेर पहिली प्रतिक्रिया आता आली आहे.

काय म्हणाले होते गोपीचंद पडळकर ?

काहीच दिवसांपूर्वी गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर अत्यंत खळबळजनक टीका केली आहे. “शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहेत. गेल्या अनेक वर्षापासून शरद पवार हे महाराष्ट्राचे नेतृत्त्व करत असूनही कायमच त्यांची भूमिका राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची राहिलेली आहे. ते पुढेही हीच भूमिका कायम ठेवतील”, अशी अत्यंत टोकाची टीका गोपीचंद पडळकर यांनी केली.

देवेंद्र फडणवीसांचा ‘तो’ गौप्यस्फोट

“२ वर्षांपूर्वी राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येणार होते. मात्र पंतप्रधान म्हणाले होते कि, “राष्ट्रवादीला सोबत घ्यायचे असेल तर शिवसेनाही सोबत असायलाच हवी. अमित शहांनी देखील शरद पवारांना हे स्पष्ट सांगितले होते. मात्र त्यावेळी आम्ही राष्ट्रवादीला सोबत घेतले नाही. खरंतर, राष्ट्रवादी पूर्णपणे आमच्यासोबत यायला तयार होती”, हा दावा फडणवीसांनी ‘द इनसायडर’साठी राजू परुळेकरांनी दिलेल्या मुलाखतीत केला.

“अजित पवारांसोबत ८० तासांच्या सरकारबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, मी योग्यवेळी याबाबतचा खुलासा करेन यावर मी स्वतःच पुस्तक लिहीन. त्यावेळी आम्हाला त्यावेळी थेट राष्ट्रवादीची ऑफर होती. लक्षात घ्या ‘राष्ट्रवादी’ म्हणजे ‘अजित पवार’ नाही. मात्र, त्यानंतर राष्ट्रवादीच्या प्रमुखांनी भूमिका बदलली. त्यानंतर आम्ही शांत होती. ३-४ दिवस आम्ही काहीही हालचाल केली नाही. त्यानंतर मात्र, आम्हाला थेट अजित पवारांकडून फिगर आली. ते म्हणाले हे तीन पक्षांचे सरकार काही टिकू शकत नाही. म्हणूनच तो पहाटेचा शपथविधी झाला”, असाही गौप्य्स्फोट यावेळी फडणवीसांनी केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोना रुग्णाच्या ‘होम आयसोलेशन’करिता केंद्राच्या नव्या महत्त्वपूर्ण सूचना

News Desk

बीडमधील जनतेचा आगळे-वेगळा उपक्रम, बाहेरुन येणाऱ्यांचे वाजत-गाजत स्वागत करून घरातच क्वारंटाईन

News Desk

राज्यात आज ६,४९७ नवे कोरोना रुग्ण आढळले तर १९३ रुग्णांचा झाला मृत्यू

News Desk