HW News Marathi
महाराष्ट्र

आम्ही सरकार एकत्र चालवतो याचा अर्थ पक्ष एकत्र चालवतो असा होत नाही!

बारामती | गेल्या काही दिवसांपूर्वी ठाकरे सरकारमधील घटक पक्ष असलेला काँग्रेस सातत्याने स्वबळावर लढण्याचा नारा देत आहे यावर बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, “काँग्रेस शिवसेना व आमच्या पक्षातील लोकही स्वबळावर लढण्याचा बद्दल बोलत आहेत. मात्र यामध्ये काही गैर आहे असे मला वाटत नाही. शेवटी प्रत्येक पक्षाला आपल्या पक्षाची व्याप्ती वाढविण्याचा अधिकार आहे. आम्ही सरकार एकत्र येऊन चालवत आहे पक्ष एकत्र येऊन चालवत नाही. सरकार चालवताना एक विचाराने आम्ही सर्व जण आहोत. त्यामुळे आमच्यात कसल्याही प्रकारचा गैरसमज नाही”, असं शरद पवारांनी स्पष्ट केले आहे.

पुढे शरद पवार यांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली त्यावर प्रश्न विचारण्यात आला. यावेळी शरद पवार म्हणाले की, “मी यात पडत नाही. हा जर सोनिया गांधी काही बोलल्या असत्या तर मी बोललो असतो”, असं म्हणत शरद पवारांनी यावर बोलणं टाळलं.

काय म्हणाले नाना पटोले?

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नाराजी व्यक्त करत आपलं मत व्यक्त केला आह. “मी जे बोललो त्यात माघार घेणारच नाही. स्वबळावरच निवडणूक लढवणार. त्यामुळे आपण कामाला लागा. मी माध्यमांशी बोलताना म्हणालो की, मुख्यमंत्र्यांनी काल शिवसैनिकांना कामाला लागण्याबद्दल सांगितलं. मग मी बोललो होतो तर त्रास होत होता, ते बोलले तर ठीक आहे. काही नाही”, असा चिमटा पटोले यांनी उद्धव ठाकरेंना काढला. यावेळी अजित पवार यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला. “आता बारामतीवाले पुण्याचे पालकमंत्री आहेत ते कुणाची कामं करतात… आपल्या लोकांची कामं करतात का? मग आपण संपर्कमंत्र्यांना लक्ष घालायला सांगतो, पण संपर्कमंत्र्यांचं ऐकायचं की नाही ते त्यांनी ठरवायचं… कारण सही त्यांची लागते. संपर्कमंत्र्यांची सही लागत नाही,” असा टोला नाना पटोले यांनी लगावला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विश्व हिंदु परिषदेच्या लोकांनी आंदोलने करण्यापेक्षा प्लाझ्मा दान करावे – अस्लम शेख

News Desk

“ येणारा धोका समजा आणि एक पाऊल पुढे टाका”, नितेश राणेंचा खोचक सल्ला

News Desk

“…तर त्यांना शेतकऱ्यांचे अश्रू काय समजणार”, फडणवीसांनी राऊतांना डिवचलं

News Desk