HW News Marathi
महाराष्ट्र

मराठा आरक्षणाचा प्रश्न दोन छत्रपतींनी भाजपाकडुनच सोडवून घ्यावा – शरद पवार

पंढरपूर | छत्रपती संभाजी राजे व छत्रपती उदयनराजे यांची नियुक्ती भाजपने केली आहे. त्यामुळे ते भाजपचीच भाषा बोलणार. दोन्ही राजांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न भाजपकडूनच सोडवून घ्यावा, अशी कोपरखळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मारली आहे. आज (२९ सप्टेंबर) पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. यावरुन, उदयनराजे यांनी आरक्षण काढूनच टाका असे म्हटले होते. तर संभाजीराजे यांनी आरक्षणाच्या आड येणाऱ्यांना ठोका अशी भूमिका घेतली होती.

दरम्यान, या दोन्ही राजांच्या भूमिकेवर शिवसेनेने मुखपत्र असलेल्या सामनातून पाठराखण करण्यात आली होती. आजच्या अग्रलेखात सातारा व कोल्हापूर घराण्यात आरक्षणाबाबत वाद आहेत किंवा लढाईत फुट आहे असे जे पसरवले जात आहे ते खरे नाही, असे म्हणत त्यांची पाठराखण केल्याने दिसून आले. तर शरद पवारांनी या मुद्दयावर त्यांनीच काय ते पाहावे अशी भूमिका मांडलेली पाहायला मिळाली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भंडारा, गोंदिया, चंद्रपूर जिल्हा वार्षिक योजनेच्या आराखड्यास मान्यता

Aprna

पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी तातडीने लक्ष घालण्यात येईल! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna

अतिरिक्त बुटीबोरी एमआयडीसीमध्ये पायाभूत सुविधा  लवकर उपलब्ध कराव्या! – देवेंद्र फडणवीस

Aprna